Monday, August 2, 2021

कुंडलिनी विद्या - भाग १५

मागील लेखात आपण आज्ञा चक्रासंबंधी माहिती घेतली. आता आपण शेवटच्या चक्राकडे म्हणजेच सहस्राराकडे वळू. 

सहस्रार हे चक्र शिवाचे निवासस्थान आहे. याच शिवाशी मीलन होण्यासाठी कुंडलिनीची धडपड आहे. आपल्यासाठी या जीवनाचा खेळ याच कुंडलिनी-शिवाच्या मीलनासाठी चालला आहे. म्हणूनच कुंडलिनी जागृतीत या चक्राचे महत्व अनन्यसाधारण आहे. हे चक्र आपल्या शरीराच्या सर्वात वरच्या टोकावर - टाळूच्या किंचित वर आहे. शरीराच्या बाहेरील हे एकमेव चक्र आहे. मूलाधार चक्रापासून आज्ञाचक्रापर्यंत जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत. परंतु आज्ञाचक्रापासून सहस्रारापर्यंत जाण्यासाठी एकही मार्ग नाही. म्हणूनच या चक्राला भेदण्यासाठी परमेश्वरी कृपेची आवश्यकता आहे असे समजले जाते. 

या चक्राच्या अधिपत्याखाली पिनल ग्लॅन्ड येते. ही ग्लॅन्ड मेलाटोनीन हे हार्मोन अत्यंत सूक्ष्म प्रमाणात स्रवते. या हार्मोनमुळे संपूर्ण शरीर तणावरहित होते. म्हणूनच हे चक्र भेदले गेल्यास सामुर्ण तणावरहित अवस्था जाणवते. कुंडलिनी ही शिवाच्या मिलनासाठीच प्रयत्न करीत असते. त्यामुळे हे चक्र भेदले गेल्यावर माणूस उन्मनी अवस्थेत जाण्याची शक्यता असते. यातून बाहेर येण्यासाठी कुल कुंडलिनी विद्या सांगितली गेली आहे. सहस्रारापासून मूलाधारचक्रापर्यंत क्रमाने ध्यान केल्यास कुंडलिनी परत तिच्या स्थानी म्हणजे मूलाधार चक्रात स्थिर होते. आवश्यक असेल तेव्हा ही शक्ती त्या त्या चक्रात प्रकट होते. म्हणूनच हे चक्र भेदले जाण्याआधी खालील सर्व चक्रे भेदली जाणे आवश्यक असते. घाई करून चालत नाही. 

पुढील लेख या लेखमालेतील शेवटचा लेख असेल. 

6 comments:

  1. सर आपले मार्गदर्शन आशेच लाभत राहो हीच अपेक्षा

    ReplyDelete
  2. आपण दिलेली माहिती खूप समाधान कारक आहे

    ReplyDelete
  3. खुपच छान माहिती आहे 🙏 🙏

    ReplyDelete