Saturday, September 11, 2021

अचपळ मन माझे - भाग १

त्रहो, आज एका नव्या लेखमालेला सुरुवात करीत आहोत. आपल्याला आवडेल अशी आशा आहे. 

हे लेख स्वामी सर्वप्रियानंद यांच्या 'Bhagawad geeta for Students' या IIT Kanpur येथे दिलेल्या व्याख्यानावर  आधारित आहेत. 

--------------------------------------------------------------------------

अचपळ मन माझे नावरे आवरीता

तुजवीण शीण होतो, धाव रे धाव आता ..

करुणाष्टके - समर्थ रामदास

--------------------------------------

अध्यात्माचा आणि आपल्या दैनंदिन जीवनाचा काही संबंध आहे काय? अध्यात्म जाणून घेतल्याने ऐहिक जीवनात काही फायदा होईल का हा प्रश्न अनेक वेळा उपस्थित केला जातो. म्हणूनच आपण आज भगवद्गीतेतील / महाभारतातील काही श्लोकांचा विचार करणार आहोत. 

आपल्यापुढील पहिला प्रश्न असा आहे की कृष्ण हा कौरव आणि पांडवांचाही मित्र होता. कृष्णाने गीतेचा उपदेश अर्जुनाला केला, पण तो दुर्योधनाला केला असता तर कदाचित महाभारत युद्ध टाळता आले असते. 

खरे आहे. कृष्णाने दुर्योधनालाही उपदेश केला होता. परंतु दुर्योधनाने त्याला स्पष्ट शब्दात सांगितले होते 

जानामि धर्मम्, नच मे प्रवृत्ति | जानामि अधर्मम्, नच मे निवृत्ति |

'तू मला माझ्या हिताच्या गोष्टी सांगतो आहेस ते मला कळते. परंतु तसे वागण्याचा माझा स्वभाव नाही.  माझ्या अहिताच्या गोष्टी मी करत आहे हे  मला कळते. पण तसे करण्यापासून मी मला रोखू शकत नाही. ' सध्याच्या भाषेत सांगायचे तर 'मला सगळे ठाऊक आहे, जास्त शानपना शिकवू नको' असेच त्याने कृष्णाला स्पष्टपणे सांगितले.  

दुर्योधनाने आपले असे का होते हे ही सांगितले. 

केनापि देवेन हृदि स्थितेन यथा नियुक्तोऽस्मि तथा करोमि ।

मला असे वाटते की माझ्या हृदयात कोणी शक्ती वास करते आहे आणि ती शक्ती माझ्याकडून (माझी इच्छा नसतानाही) जसे  करवून घेते तसे मी करतो.  मी माझ्या इचछेनुसार याबाबत काही करू शकत नाही. 

खरेतर ही समस्या केवळ दुर्योधनाची नाही. आपण सर्वांचीच ही समस्या आहे. एखादी गोष्ट करण्याचे आपण ठरवतो, ठाम निश्चय करतो. परंतु तो निर्णय अमलात आणण्याची वेळ येताच आपण अगदी विरद्ध पर्यायाची निवड करतो. नंतर काही काळाने आपल्याला पश्चात्ताप होतो. पण हा स्वभाव काही बदलत नाही. आपण आपले वजन कमी करण्यासाठी भरपूर पैसे भरून डॉक्टरांचा सल्ला घेतो.  पण डॉक्टरांनी वर्ज्य करण्यास सांगितलेले खाद्य पदार्थ समोर येताच आपला निश्चय ढासळतो. थोडे खाल्ले तरी काही होत नाही अशी आपणच आपली समजूत घालतो आणि नंतर पस्तावतो. विद्यार्थी नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस खूप अभ्यास करण्याचा निश्चय करतो. वर्षाच्या शेवटी त्याची आठवण येते. आपण रोज सकाळी उठून व्यायाम करण्याचा निश्चय करतो. पण सकाळी घड्याळाचा गजर होताच स्नूझ करून पुन्हा झोपी जातो. आपल्या सगळ्यांचाच अनुभव आहे.  काहीतरी करून दाखविण्याचा आपण निश्चय करतो, पण प्रत्यक्ष कृतीची वेळ येताच आपण भलतेच करतो.   कठोपनिषदात हीच समस्या 'श्रेयस' आणि 'प्रेयस' अशा द्वंदातून पुढे येते. जे आपल्या भविष्यासाठी योग्य ते श्रेयस आणि जे आत्ता करावेसे वाटते ते प्रेयस. 

कृष्णाने जेव्हा अर्जुनाला उपदेश करण्यास प्रारंभ केला तेव्हा अर्जुनाने हीच समस्या कृष्णापुढे मांडली. मात्र दुर्योधन आणि अर्जुन यांच्या सांगण्यात फरक आहे. दुर्योधन याकडे समस्या म्हणून पाहात नाही, तर वस्तुस्थिती म्हणून स्वीकार करतो. त्याला ही वस्तुस्थिती बदलण्याची इच्छा नाही, तसा विचारही तो करू शकत नाही. मात्र अर्जुन ही समस्या कृष्णापुढे मांडतो आणि ती कशी सोडवावी याच्या मार्गदर्शनाचीही अपेक्षा करतो. अर्जुनाचा समस्येकडे बघण्याचा - समस्येतून मार्ग काढण्याचा दृष्टिकोनच आपल्याला बरेच काही शिकवून जातो. 

श्रीकृष्णाने यावर काय उपाय सांगितला हे आपण बघू पुढील लेखात. 


संतोष कारखानीस

Wednesday, September 8, 2021

गुरु


तो धिटाईने वृद्ध गुरुसमोर उभा होता. गुरु त्यांच्या अनुभवी नजरेने त्याचे निरीक्षण करत होते.
कोवळं वय. असेल साधारण नऊ दहा वर्षाचा. त्याला डावा हातच नव्हता. एका अपघाताने तो हिरावून घेतला होता म्हणे.
" तुला माझ्या कडून काय हवे आहे ???" गुरूने त्या मुलाला विचारले.
"सर, मला तुमच्या कडून ज्युडो-कराटेची विद्या शिकायची आहे !!!"
शरीराला एक हातच नाही आणि ज्युडो शिकायचं आहे ??? अजब मुलगा दिसतोय.
"कशाला ???"
"शाळेत मला मुलं त्रास देतात. थोटक्या म्हणून चिडवतात. मोठी माणसं नको तितकी कीव करतात. मला त्यांच्या या वागण्याचा त्रास होतो !! मला माझ्या हिमतीवर जगायचंय !! कोणाची दया नको. हात नसताना मला माझं रक्षण करता आलं पाहिजे !!"
"ठीक आहे !! पण मी आता तो 'शिक्षण' देणारा गुरु राहिलो नाही. मी आता वृद्ध झालोय आणि आत्मचिंतनात मग्न असतो. तुला माझ्या कडे कोणी पाठवलं ???"
"सर, मला एक हात नसल्याने खूप जणांनी त्यांचा 'विद्यार्थी' म्हणून नाकारलं. त्यातल्याच एकाने तुमचे नाव सांगितले. 'तुला फक्त तेच शिकवू शकतील. कारण त्यांना खूप वेळ असतो आणि त्यांच्याकडे एकही विद्यार्थी नाही !!' असे ते म्हणाले होते."
'तो उन्मत्त 'शिक्षक' कोण हे गुरूंनी तात्काळ ओळखले. अशा अहंकारी माणसांमुळेच ही विद्या गुंड प्रवृत्तीच्या हाती गेली. याचे त्यांना नेहमीच वाईट वाटे.
"ठीक आहे, आज पासून तुला मी माझा 'शिष्य' करून घेत आहे. या शिष्यत्वाचे नियम तुला आज पहिल्यांदा आणि शेवटचे सांगतो. लक्षात ठेव, *आपल्या गुरूवर पूर्ण विश्वास ठेवायचा*. मी माझ्या लहरी प्रमाणे शिकवीन ते शिकून घ्यायचे. ज्युडो-कराटे ही खूप घातक विद्या आहे. तिच्यामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो !! म्हणून ही विद्या फक्त आत्मरक्षणासाठीच वापरायची. नेहमी नम्र रहायचे. समजले ???"
"हो सर. समजले. मी आपल्या या आज्ञांचे पालन करीन." मुलाने गुरूच्या पायावर डोके ठेवले. आणि आपल्या एकुलत्या एक शिष्याच्या शिक्षणास त्यांनी आरंभ केला.
एकच डाव गुरूंनी त्याला शिकवला आणि तोच ते त्याच्याकडून करून घेऊ लागले. सहा महिने हेच चालू राहिले. एक दिवशी मुलाने गुरूचा चांगला मूड बघून हळूच विषय काढला.
"सर, सहा महिने झालेत. एकच मूव्ह तुम्ही माझ्या कडून करून घेत आहात. नवीन डाव असतीलच ना ???"
"आहेत! अनंत डाव आहेत !! ते आत्मसात करायला, तुला तुझं आयुष्य कमी पडेल !! पण तुला मी शिकवतो आहे त्याचीच गरज आहे. आणि इतकेच तुझ्या साठी पुरेसे पण आहे !!"
गुरुवचनावर विश्वास ठेवून तो शिकत राहिला.
बरेच दिवसानंतर ज्युडोचे टुर्नामेंटस जाहीर झाले. गुरूंनी आपला एकमेव शिष्य यात उतरवला. पहिले दोन सामने त्या शिष्याने सहज जिंकले !!
पहाणारे आश्चर्यचकित झाले. एक हात नसलेला मुलगा जिंकलाच कसा ??? कोण गुरु असावा ??
तिसरा सामना थोडासा कठीण होता, पण त्या मुलाच्या सफाईदार आणि वेगवान हालचालींनी तो सामना सुद्धा त्यानेच जिंकला !!
आता त्या मुलाचा आत्मविश्वास बळावला. आपणही जिंकू शकतो !! ही भावना त्याला बळ देत होती. बघता बघता तो अंतिम सामन्यात पोहोचला.
ज्या शिक्षकाने, त्या मुलास म्हाताऱ्या गुरुकडे पाठवले होते, त्या अहंकारी माणसाचा शिष्यच, त्या मुलाचा अंतिम फेरीतील प्रतिस्पर्धी होता !!
प्रतिस्पर्धी त्या मुलाच्या मानाने खूपच बलवान होता. वयाने, शक्तीने, अनुभवाने सरस होता. या कोवळ्या वयाच्या पोराला तो सहज धूळ चारणार हे स्पष्ट दिसत होते. पंचानी एकत्र येऊन विचार केला.
"हा सामना घेणे आम्हास उचित वाटत नाही, कारण प्रतिस्पर्धी विजोड आहेत. एक बलवान तर एक दिव्यांग आहे. हा सामना मानवतेच्या आणि समानतेच्या दृष्टिकोनातून आम्ही थांबवू इच्छितो. प्रथम जेते पद विभागून देण्यात येईल! अर्थात दोन्ही प्रतिस्पर्धी यास तयार असतील तरच." मुख्य पंचाने आपला निर्णय जाहीर केला.
"मी या चिरगुट पोरा पेक्षा श्रेष्ठ आहे यात दुमत असण्याचे कारण नाही. हे सगळ्यांना स्पष्ट दिसतच आहे. तेव्हा मला विजेता आणि या पोराला उपविजेता म्हणून घोषित करावे !!" तो प्रतिस्पर्धी उर्मटपणे म्हणाला.
"मी लहान असेन, तरी मला हे टाकलेले उपविजेतेपद नको आहे !! माझ्या गुरूंनी प्रामाणिकपणे लढण्याचे शिक्षण दिलेले आहे. मी ठरलेला सामना खेळून जे माझ्या हक्काचे जेते पद आहे ते स्वीकारीन !!" त्या लढवय्याचे उत्तर ऐकून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
जाणकारांच्या कपाळावर मात्र आठ्या पडल्या. कारण हे ओढवून घेतलेले संकट होते. थोडे कमी जास्त झाले तर ??? आधीच एक हात नाही अजून एखादा अवयव गमावला जायचा !! मूर्ख मुलगा !!
सामना सुरु झाला. आणि सगळी मंडळी आश्चर्याने स्तिमित झाली. त्या एका अनमोल क्षणी त्या अपंग मुलाची जीवघेणी थ्रो केलेली किक, त्या बलवान प्रतिस्पर्ध्याला चुकवता आली नाही. तो रिंगणाबाहेर फेकला गेला. परफेक्ट थ्रो, परफेक्ट टाईमिंग, नेमका लावलेला फोर्स !! अप्रतिम! केवळ अप्रतिम !!!
गुरुगृही पोहचल्यावर, त्या मुलाने आपल्या उजव्या हातातली विजयाची ट्रॉफी गुरुजींच्या पायाशी ठेवली. त्यांना पायावर डोके ठेवून आपली पूज्य भावना व्यक्त केली.
"सर, एक शंका आहे. विचारू ???"
"विचार."
"मला फक्त एकच डाव/ मूव्ह येते. तरीही मी कसा जिंकलो ???"
"तू दोन गोष्टी मुळे जिंकलास !!"
"कोणत्या,सर ???"
"एक तू घोटून, न कंटाळता केलेला सराव !! त्या मुळे तुझा तो डाव 'सिद्ध' झाला आहे, आत्मसात झाला आहे !! त्यात चूक होणे अशक्य आहे !!"
"आणि दुसरे कारण ???"
"दुसरे कारण हे, त्याहून महत्वाचे आहे. प्रत्यक डावाचा एक प्रतिडाव असतो !! तसाच या डावाचाही एक उतारा डाव आहे !!"
"मग तो, माझ्या अनुभवी प्रतिस्पर्ध्यास माहित नव्हता कां ???"
"तो त्याला माहित होता !! पण तो हतबल झाला, कारण ??? कारण या प्रतिडावात, हल्ला करणाऱ्या प्रतिस्पर्ध्याचा डावा हात धरावा लागतो !!"
आता तुम्हाला समजले असेल की, एक सामान्य, एक हात नसलेला मुलगा कसा जिंकला ???
ज्या गोष्टीला आपण आपली कमजोरी समजतो, तिलाच जो आपली शक्ती बनवून जगायला शिकवतो, विजयी व्हायला शिकवतो, तोच खरा गुरु !!!
*आतून आपण कोठे ना कोठे 'दिव्यांग' असतो, कमजोर असतो. फक्त त्यावर मात करून जगण्याची कला शिकवणारा 'गुरु' हवा !!!*
🙏✌️🙏✌️🙏✌️🙏.

शक्तीपीठे

 1 शक्ति पीठो का विवरण (Details of 51 Shakti Peethas) :

1. किरीट शक्तिपीठ (Kirit Shakti Peeth) :
किरीट शक्तिपीठ, पश्चिम बंगाल के हुगली नदी के तट लालबाग कोट पर स्थित है। यहां सती माता का किरीट यानी शिराभूषण या मुकुट गिरा था। यहां की शक्ति विमला अथवा भुवनेश्वरी तथा भैरव संवर्त हैं।
(शक्ति का मतलब माता का वह रूप जिसकी पूजा की जाती है तथा भैरव का मतलब शिवजी का वह अवतार जो माता के इस रूप के स्वांगी है )
2. कात्यायनी शक्तिपीठ (Katyayani Shakti Peeth ) :
वृन्दावन, मथुरा के भूतेश्वर में स्थित है कात्यायनी वृन्दावन शक्तिपीठ जहां सती का केशपाश गिरा था। यहां की शक्ति देवी कात्यायनी हैं तथा भैरव भूतेश है।
3. करवीर शक्तिपीठ (Karveer shakti Peeth) :
महाराष्ट्र के कोल्हापुर में स्थित है यह शक्तिपीठ, जहां माता का त्रिनेत्र गिरा था। यहां की शक्ति महिषासुरमदिनी तथा भैरव क्रोधशिश हैं। यहां महालक्ष्मी का निज निवास माना जाता है।
4. श्री पर्वत शक्तिपीठ (Shri Parvat Shakti Peeth) :
इस शक्तिपीठ को लेकर विद्वानों में मतान्तर है कुछ विद्वानों का मानना है कि इस पीठ का मूल स्थल लद्दाख है, जबकि कुछ का मानना है कि यह असम के सिलहट में है जहां माता सती का दक्षिण तल्प यानी कनपटी गिरा था। यहां की शक्ति श्री सुन्दरी एवं भैरव सुन्दरानन्द हैं।
5. विशालाक्षी शक्तिपीठ (Vishalakshi Shakti Peeth) :
उत्तर प्रदेश, वाराणसी के मीरघाट पर स्थित है शक्तिपीठ जहां माता सती के दाहिने कान के मणि गिरे थे। यहां की शक्ति विशालाक्षी तथा भैरव काल भैरव हैं।
6. गोदावरी तट शक्तिपीठ (Godavari Coast Shakti Peeth) :
आंध्रप्रदेश के कब्बूर में गोदावरी तट पर स्थित है यह शक्तिपीठ, जहां माता का वामगण्ड यानी बायां कपोल गिरा था। यहां की शक्ति विश्वेश्वरी या रुक्मणी तथा भैरव दण्डपाणि हैं।
7. शुचीन्द्रम शक्तिपीठ (Suchindram shakti Peeth) :
तमिलनाडु, कन्याकुमारी के त्रिासागर संगम स्थल पर स्थित है यह शुची शक्तिपीठ, जहां सती के उफध्र्वदन्त (मतान्तर से पृष्ठ भागद्ध गिरे थे। यहां की शक्ति नारायणी तथा भैरव संहार या संकूर हैं।
8. पंच सागर शक्तिपीठ (Panchsagar Shakti Peeth) :
इस शक्तिपीठ का कोई निश्चित स्थान ज्ञात नहीं है लेकिन यहां माता का नीचे के दान्त गिरे थे। यहां की शक्ति वाराही तथा भैरव महारुद्र हैं।
9. ज्वालामुखी शक्तिपीठ (Jwalamukhi Shakti Peeth) :
हिमाचल प्रदेश के काँगड़ा में स्थित है यह शक्तिपीठ, जहां सती का जिह्वा गिरी थी। यहां की शक्ति सिद्धिदा व भैरव उन्मत्त हैं।
10. भैरव पर्वत शक्तिपीठ (Bhairavparvat Shakti Peeth) :
इस शक्तिपीठ को लेकर विद्वानों में मतदभेद है। कुछ गुजरात के गिरिनार के निकट भैरव पर्वत को तो कुछ मध्य प्रदेश के उज्जैन के निकट क्षीप्रा नदी तट पर वास्तविक शक्तिपीठ मानते हैं, जहां माता का उफध्र्व ओष्ठ गिरा है। यहां की शक्ति अवन्ती तथा भैरव लंबकर्ण हैं।
11. अट्टहास शक्तिपीठ ( Attahas Shakti Peeth) :
अट्टहास शक्तिपीठ पश्चिम बंगाल के लाबपुर में स्थित है। जहां माता का अध्रोष्ठ यानी नीचे का होंठ गिरा था। यहां की शक्ति पफुल्लरा तथा भैरव विश्वेश हैं।
12. जनस्थान शक्तिपीठ (Janasthan Shakti Peeth) :
महाराष्ट्र नासिक के पंचवटी में स्थित है जनस्थान शक्तिपीठ जहां माता का ठुड्डी गिरी थी। यहां की शक्ति भ्रामरी तथा भैरव विकृताक्ष हैं।
13. कश्मीर शक्तिपीठ या अमरनाथ शक्तिपीठ (Kashmir Shakti Peeth or Amarnath Shakti Peeth) :
जम्मू-कश्मीर के अमरनाथ में स्थित है यह शक्तिपीठ जहां माता का कण्ठ गिरा था। यहां की शक्ति महामाया तथा भैरव त्रिसंध्येश्वर हैं।
14. नन्दीपुर शक्तिपीठ (Nandipur Shakti Peeth) :
पश्चिम बंगाल के सैन्थया में स्थित है यह पीठ, जहां देवी की देह का कण्ठहार गिरा था। यहां कि शक्ति निन्दनी और भैरव निन्दकेश्वर हैं।
15. श्री शैल शक्तिपीठ (Shri Shail Shakti Peeth ) :
आंध्रप्रदेश के कुर्नूल के पास है श्री शैल का शक्तिपीठ, जहां माता का ग्रीवा गिरा था। यहां की शक्ति महालक्ष्मी तथा भैरव संवरानन्द अथव ईश्वरानन्द हैं।
16. नलहटी शक्तिपीठ (Nalhati Shakti Peeth) :
पश्चिम बंगाल के बोलपुर में है नलहटी शक्तिपीठ, जहां माता का उदरनली गिरी थी। यहां की शक्ति कालिका तथा भैरव योगीश हैं।
17. मिथिला शक्तिपीठ (Mithila Shakti Peeth ) :
इसका निश्चित स्थान अज्ञात है। स्थान को लेकर मन्तारतर है तीन स्थानों पर मिथिला शक्तिपीठ को माना जाता है, वह है नेपाल के जनकपुर, बिहार के समस्तीपुर और सहरसा, जहां माता का वाम स्कंध् गिरा था। यहां की शक्ति उमा या महादेवी तथा भैरव महोदर
18. रत्नावली शक्तिपीठ (Ratnavali Shakti Peeth) :
इसका निश्चित स्थान अज्ञात है, बंगाज पंजिका के अनुसार यह तमिलनाडु के चेन्नई में कहीं स्थित है रत्नावली शक्तिपीठ जहां माता का दक्षिण स्कंध् गिरा था। यहां की शक्ति कुमारी तथा भैरव शिव हैं।
19. अम्बाजी शक्तिपीठ (Ambaji Shakti Peeth) :
गुजरात गूना गढ़ के गिरनार पर्वत के शिखर पर देवी अम्बिका का भव्य विशाल मन्दिर है, जहां माता का उदर गिरा था। यहां की शक्ति चन्द्रभागा तथा भैरव वक्रतुण्ड है। ऐसी भी मान्यता है कि गिरिनार पर्वत के निकट ही सती का उध्र्वोष्ठ गिरा था, जहां की शक्ति अवन्ती तथा भैरव लंबकर्ण है।
20. जालंध्र शक्तिपीठ (Jalandhar Shakti Peeth) :
पंजाब के जालंध्र में स्थित है माता का जालंध्र शक्तिपीठ जहां माता का वामस्तन गिरा था। यहां की शक्ति त्रिापुरमालिनी तथा भैरव भीषण हैं।.
21. रामागरि शक्तिपीठ (Ramgiri Shakti Peeth) :
इस शक्ति पीठ की स्थिति को लेकर भी विद्वानों में मतान्तर है। कुछ उत्तर प्रदेश के चित्राकूट तो कुछ मध्य प्रदेश के मैहर में मानते हैं, जहां माता का दाहिना स्तन गिरा था। यहा की शक्ति शिवानी तथा भैरव चण्ड हैं।
22. वैद्यनाथ शक्तिपीठ (Vaidhnath Shakti Peeth) :
झारखण्ड के गिरिडीह, देवघर स्थित है वैद्यनाथ हार्द शक्तिपीठ, जहां माता का हृदय गिरा था। यहां की शक्ति जयदुर्गा तथा भैरव वैद्यनाथ है। एक मान्यतानुसार यहीं पर सती का दाह-संस्कार भी हुआ था।
23. वक्त्रोश्वर शक्तिपीठ (Varkreshwar Shakti Peeth) :
माता का यह शक्तिपीठ पश्चिम बंगाल के सैन्थया में स्थित है जहां माता का मन गिरा था। यहां की शक्ति महिषासुरमदिनी तथा भैरव वक्त्रानाथ हैं।
24. कण्यकाश्रम कन्याकुमारी शक्तिपीठ (Kanyakumari Shakti Peeth) :
तमिलनाडु के कन्याकुमारी के तीन सागरों हिन्द महासागर, अरब सागर तथा बंगाल की खाड़ीद्ध के संगम पर स्थित है कण्यकाश्रम शक्तिपीठ, जहां माता का पीठ मतान्तर से उध्र्वदन्त गिरा था। यहां की शक्ति शर्वाणि या नारायणी तथा भैरव निमषि या स्थाणु हैं।
25. बहुला शक्तिपीठ (Bahula Shakti Peeth) :
पश्चिम बंगाल के कटवा जंक्शन के निकट केतुग्राम में स्थित है बहुला शक्तिपीठ, जहां माता का वाम बाहु गिरा था। यहां की शक्ति बहुला तथा भैरव भीरुक हैं।
26. उज्जयिनी शक्तिपीठ (Ujjaini Shakti Peeth) :
मध्य प्रदेश के उज्जैन के पावन क्षिप्रा के दोनों तटों पर स्थित है उज्जयिनी शक्तिपीठ। जहां माता का कुहनी गिरा था। यहां की शक्ति मंगल चण्डिका तथा भैरव मांगल्य कपिलांबर हैं।
27. मणिवेदिका शक्तिपीठ (Manivedika Shakti Peeth) :
राजस्थान के पुष्कर में स्थित है मणिदेविका शक्तिपीठ, जिसे गायत्री मन्दिर के नाम से जाना जाता है यहीं माता की कलाइयां गिरी थीं। यहां की शक्ति गायत्री तथा भैरव शर्वानन्द हैं।
28. प्रयाग शक्तिपीठ (Prayag Shakti peeth) :
उत्तर प्रदेश के इलाहाबाद में स्थित है। यहां माता की हाथ की अंगुलियां गिरी थी। लेकिन, स्थानों को लेकर मतभेद इसे यहां अक्षयवट, मीरापुर और अलोपी स्थानों गिरा माना जाता है। तीनों शक्तिपीठ की शक्ति ललिता हैं तथा भैरव भव है।
29. विरजाक्षेत्रा, उत्कल शक्तिपीठ (Utakal Shakti Peeth) :
उड़ीसा के पुरी और याजपुर में माना जाता है जहां माता की नाभि गिरा था। यहां की शक्ति विमला तथा भैरव जगन्नाथ पुरुषोत्तम हैं।
30. कांची शक्तिपीठ (Kanchi Shakti Peeth) :
तमिलनाडु के कांचीवरम् में स्थित है माता का कांची शक्तिपीठ, जहां माता का कंकाल गिरा था। यहां की शक्ति देवगर्भा तथा भैरव रुरु हैं।
31. कालमाध्व शक्तिपीठ (Kalmadhav Shakti Peeth) :
इस शक्तिपीठ के बारे कोई निश्चित स्थान ज्ञात नहीं है। परन्तु, यहां माता का वाम नितम्ब गिरा था। यहां की शक्ति काली तथा भैरव असितांग हैं।
32. शोण शक्तिपीठ (Shondesh Shakti Peeth) :
मध्य प्रदेश के अमरकंटक के नर्मदा मन्दिर शोण शक्तिपीठ है। यहां माता का दक्षिण नितम्ब गिरा था। एक दूसरी मान्यता यह है कि बिहार के सासाराम का ताराचण्डी मन्दिर ही शोण तटस्था शक्तिपीठ है।
यहां सती का दायां नेत्रा गिरा था ऐसा माना जाता है। यहां की शक्ति नर्मदा या शोणाक्षी तथा भैरव भद्रसेन हैं।
33. कामाख्या शक्तिपीठ (Kamakhya Shakti peeth) :
कामगिरि असम गुवाहाटी के कामगिरि पर्वत पर स्थित है यह शक्तिपीठ, जहां माता का योनि गिरा था। यहां की शक्ति कामाख्या तथा भैरव उमानन्द हैं।
34. जयन्ती शक्तिपीठ (Jayanti Shakti Peeth) :
जयन्ती शक्तिपीठ मेघालय के जयन्तिया पहाडी पर स्थित है, जहां माता का वाम जंघा गिरा था। यहां की शक्ति जयन्ती तथा भैरव क्रमदीश्वर हैं।
35. मगध् शक्तिपीठ (Magadh Shakti Peeth) :
बिहार की राजधनी पटना में स्थित पटनेश्वरी देवी को ही शक्तिपीठ माना जाता है जहां माता का दाहिना जंघा गिरा था। यहां की शक्ति सर्वानन्दकरी तथा भैरव व्योमकेश हैं।
36. त्रिस्तोता शक्तिपीठ (Trishota Shakti Peeth) :
पश्चिम बंगाल के जलपाइगुड़ी के शालवाड़ी गांव में तीस्ता नदी पर स्थित है त्रिस्तोता शक्तिपीठ, जहां माता का वामपाद गिरा था। यहां की शक्ति भ्रामरी तथा भैरव ईश्वर हैं।
37. त्रिपुरी सुन्दरी शक्तित्रिपुरी पीठ (Tripura Sundari Shakti Peeth) :
त्रिपुरा के राध किशोर ग्राम में स्थित है त्रिपुरे सुन्दरी शक्तिपीठ, जहां माता का दक्षिण पाद गिरा था। यहां की शक्ति त्रिापुर सुन्दरी तथा भैरव त्रिपुरेश हैं।
38 . विभाष शक्तिपीठ (Vibhasha Shakti Peeth) :
पश्चिम बंगाल के मिदनापुर के ताम्रलुक ग्राम में स्थित है विभाष शक्तिपीठ, जहां माता का वाम टखना गिरा था। यहां की शक्ति कापालिनी, भीमरूपा तथा भैरव सर्वानन्द हैं।
39. देवीकूप पीठ कुरुक्षेत्र शक्तिपीठ (Kurukshetra Shakti Peeth) :
हरियाणा के कुरुक्षेत्र जंक्शन के निकट द्वैपायन सरोवर के पास स्थित है कुरुक्षेत्र शक्तिपीठ, जिसे श्रीदेवीकूप भद्रकाली पीठ के नाम से भी जाना जाता है। यहां माता के दहिने चरण (गुल्पफद्ध) गिरे थे। यहां की शक्ति सावित्री तथा भैरव स्थाणु हैं।
40. युगाद्या शक्तिपीठ, क्षीरग्राम शक्तिपीठ (Ughadha Shakti Peeth) :
पश्चिम बंगाल के बर्दमान जिले के क्षीरग्राम में स्थित है युगाद्या शक्तिपीठ, यहां सती के दाहिने चरण का अंगूठा गिरा था। यहां की शक्ति जुगाड़या और भैरव क्षीर खंडक है।
41. विराट का अम्बिका शक्तिपीठ (Virat Nagar Shakti Peeth) :
राजस्थान के गुलाबी नगरी जयपुर के वैराटग्राम में स्थित है विराट शक्तिपीठ, जहाँ सती के 'दायें पाँव की उँगलियाँ' गिरी थीं।। यहां की शक्ति अंबिका तथा भैरव अमृत हैं।
42. कालीघाट शक्तिपीठ (Kalighat Shakti Peeth) :
पश्चिम बंगाल, कोलकाता के कालीघाट में कालीमन्दिर के नाम से प्रसिध यह शक्तिपीठ, जहां माता के दाएं पांव की अंगूठा छोड़ 4 अन्य अंगुलियां गिरी थीं। यहां की शक्ति कालिका तथा भैरव नकुलेश हैं।
43. मानस शक्तिपीठ (Manasa Shakti Peeth) :
तिब्बत के मानसरोवर तट पर स्थित है मानस शक्तिपीठ, जहां माता का दाहिना हथेली का निपात हुआ था। यहां की शक्ति की दाक्षायणी तथा भैरव अमर हैं।
44. लंका शक्तिपीठ (Lanka Shakti Peeth) :
श्रीलंका में स्थित है लंका शक्तिपीठ, जहां माता का नूपुर गिरा था। यहां की शक्ति इन्द्राक्षी तथा भैरव राक्षसेश्वर हैं। लेकिन, उस स्थान ज्ञात नहीं है कि श्रीलंका के किस स्थान पर गिरे थे।
45. गण्डकी शक्तिपीठ (Gandaki Shakti Peeth) :
नेपाल में गण्डकी नदी के उद्गम पर स्थित है गण्डकी शक्तिपीठ, जहां सती के दक्षिणगण्ड(कपोल) गिरा था। यहां शक्ति `गण्डकी´ तथा भैरव `चक्रपाणि´ हैं।
46. गुह्येश्वरी शक्तिपीठ (Guhyeshwari Shakti Peeth) :
नेपाल के काठमाण्डू में पशुपतिनाथ मन्दिर के पास ही स्थित है गुह्येश्वरी शक्तिपीठ है, जहां माता सती के दोनों जानु (घुटने) गिरे थे। यहां की शक्ति `महामाया´ और भैरव `कपाल´ हैं।
47. हिंगलाज शक्तिपीठ (Hinglaj Shakti Peeth) :
पाकिस्तान के ब्लूचिस्तान प्रान्त में स्थित है माता हिंगलाज शक्तिपीठ, जहां माता का ब्रह्मरन्ध्र (सर का ऊपरी भाग) गिरा था। यहां की शक्ति कोट्टरी और भैरव भीमलोचन है।
48. सुगंध शक्तिपीठ (Sugandha Shakti Peeth) :
बांग्लादेश के खुलना में सुगंध नदी के तट पर स्थित है उग्रतारा देवी का शक्तिपीठ, जहां माता का नासिका गिरा था। यहां की देवी सुनन्दा है तथा भैरव त्रयम्बक हैं।
49. करतोयाघाट शक्तिपीठ (Kartoyatat Shakti Peeth) :
बंग्लादेश भवानीपुर के बेगड़ा में करतोया नदी के तट पर स्थित है करतोयाघाट शक्तिपीठ, जहां माता का वाम तल्प गिरा था। यहां देवी अपर्णा रूप में तथा शिव वामन भैरव रूप में वास करते हैं।
50. चट्टल शक्तिपीठ (Chatal Shakti Peeth) :
बंग्लादेश के चटगांव में स्थित है चट्टल का भवानी शक्तिपीठ, जहां माता का दाहिना बाहु यानी भुजा गिरा था। यहां की शक्ति भवानी तथा भेरव चन्द्रशेखर हैं।
51. यशोर शक्तिपीठ (Yashor Shakti Peeth) :
बांग्लादेश के जैसोर खुलना में स्थित है माता का यशोरेश्वरी शक्तिपीठ, जहां माता का बायीं हथेली गिरा था। यहां शक्ति यशोरेश्वरी तथा भैरव चन्द्र हैं।
पवित्र शक्ति पीठ पूरे भारतीय उपमहाद्वीप पर स्थापित हैं। देवी पुराण में 51 शक्तिपीठों का वर्णन है। देवी भागवत में जहां 108 और देवी गीता में 72 शक्तिपीठों का वर्णन मिलता है, वहीं तन्त्र चूडामणि में 52 शक्तिपीठ बताए गए हैं। देवी पुराण में 51 शक्तिपीठ की ही चर्चा की गई है। इन 51 शक्तिपीठों में से कुछ विदेश में भी हैं। वर्तमान में भारत में 42, पाकिस्तान में 1, बांग्लादेश में 4, श्रीलंका में 1, तिब्बत में 1 तथा नेपाल में 2 शक्ति पीठ है।
कैसे बने शक्तिपीठ, पढ़ें पौराणिक कथा :
देवी माता के 51 शक्तिपीठों के बनने के सन्दर्भ में पौराणिक कथा प्रचलित है। राजा प्रजापति दक्ष की पुत्री के रूप में माता जगदम्बिका ने सती के रूप में जन्म लिया था और भगवान शिव से विवाह किया। एक बार मुनियों के एक समूह ने यज्ञ आयोजित किया। यज्ञ में सभी देवताओं को बुलाया गया था। जब राजा दक्ष आए तो सभी लोग खड़े हो गए लेकिन भगवान शिव खड़े नहीं हुए। भगवान शिव दक्ष के दामाद थे। यह देख कर राजा दक्ष बेहद क्रोधित हुए। अपने इस अपमान का बदला लेने के लिए सती के पिता राजा प्रजापति दक्ष ने यज्ञ का आयोजन किया था। उस यज्ञ में ब्रह्मा, विष्णु, इंद्र और अन्य देवी-देवताओं को आमंत्रित किया, लेकिन जान-बूझकर अपने जमाता और सती के पति भगवान शिव को इस यज्ञ में शामिल होने के लिए निमंत्रण नहीं भेजा।
भगवान शिव इस यज्ञ में शामिल नहीं हुए। नारद जी से सती को पता चला कि उनके पिता के यहां यज्ञ हो रहा है लेकिन उन्हें निमंत्रित नहीं किया गया है। इसे जानकर वे क्रोधित हो उठीं। नारद ने उन्हें सलाह दी कि पिता के यहां जाने के लिए बुलावे की जरूरत नहीं होती है। जब सती अपने पिता के घर जाने लगीं तब भगवान शिव ने उन्हें समझाया लेकिन वह नहीं मानी तो स्वयं जाने से इंकार कर दिया।

शंकरजी के रोकने पर भी जिद कर सती यज्ञ में शामिल होने चली गई। यज्ञ-स्थल पर सती ने अपने पिता दक्ष से शंकर जी को आमंत्रित न करने का कारण पूछा और पिता से उग्र विरोध प्रकट किया। इस पर दक्ष, भगवान शंकर के विषय में सती के सामने ही अपमानजनक बातें करने लगे। इस अपमान से पीड़ित सती ने यज्ञ-कुंड में कूदकर अपनी प्राणाहुति दे दी।
भगवान शंकर को जब पता चला तो क्रोध से उनका तीसरा नेत्र खुल गया। सर्वत्र प्रलय व हाहाकार मच गया। भगवान शंकर के आदेश पर वीरभद्र ने दक्ष का सिर काट दिया और अन्य देवताओं को शिव निंदा सुनने की भी सज़ा दी। भगवान शिव ने यज्ञकुंड से सती के पार्थिव शरीर को निकाल कंधे पर उठा लिया और दुःखी हुए सम्पूर्ण भूमंडल पर भ्रमण करने लगे।
भगवती सती ने अन्तरिक्ष में शिव को दर्शन दिए और कहा कि जिस-जिस स्थान पर उनके शरीर के अंग विभक्त होकर गिरेंगे, वहां महाशक्तिपीठ का उदय होगा। सती का शव लेकर शिव पृथ्वी पर विचरण करते हुए तांडव नृत्य भी करने लगे, जिससे पृथ्वी पर प्रलय की स्थिति उत्पन्न होने लगी। पृथ्वी समेत तीनों लोकों को व्याकुल देखकर भगवान विष्णु सुदर्शन चक्र से सती के शरीर को खंड-खंड कर धरती पर गिराते गए। जब-जब शिव नृत्य मुद्रा में पैर पटकते, विष्णु अपने चक्र से सती शरीर का कोई अंग काटकर उसके टुकड़े पृथ्वी पर गिरा देते। > 'तंत्र-चूड़ामणि' के अनुसार इस प्रकार जहां-जहां सती के अंग के टुकड़े, धारण किए वस्त्र या आभूषण गिरे, वहां-वहां शक्तिपीठ अस्तित्व में आया। इस तरह कुल 51 स्थानों में माता की शक्तिपीठों का निर्माण हुआ। अगले जन्म में सती ने हिमवान राजा के घर पार्वती के रूप में जन्म लिया और घोर तपस्या कर शिव को पुन: पति रूप में प्राप्त किया।
जय माँ भवानी 🙏🏼
अमित पांडेय जी की भित्ति से ग्रहीत

Tuesday, September 7, 2021

श्रीरंगनाथस्वामी मंदिर : मिलिंद चिंचोळकर

 आश्चर्यकारक आणि अकल्पनीय :

जगभरातील सर्वांनाच इजिप्तच्या राजांचे मृतदेह (ममी) आणि भारतातील गोव्यातील सेंट झेवियरचे संरक्षित मृतदेह पाहून आश्चर्य वाटते.... परंतु फारच कमी लोकांना हे माहित असेल की इजिप्तच्या राजांचे मृतदेह गुंडाळण्यासाठी ज्या विशिष्ट कापडाचा वापर केला जात असे त्या कापडाला हल्ली मसलीन म्हणून ओळखलं जातं ते कापड मसली(मच्छली पट्टणम) श्रीरंग पट्टणम म्हणजेआपल्या भारतातूनच आयात केले गेले होते. श्रीरंगम (जिल्हा: तिरुचिरापल्ली, तामिळनाडू) येथील "श्रीरंगनाथस्वामी मंदिर", ज्यात भारतातील सर्वात मोठे मंदिर प्रासाद असल्याची मान्यता आहे, येथे स्वामी रामानुजाचार्य (१०१७ - ११३७) यांचे पद्मासन घातलेल्या अवस्थेतील भौतिक शरीर आहे, जे “विशिष्ठाद्वैत” तत्त्वज्ञानाचे महान आचार्य आणि

श्रीवैष्णव परंपरेचे प्रणेते होते. त्यांचे ८७८ वर्षे जतन केलेले भौतिक शरीर या ठिकाणी बघायला मिळू शकते. हे भौतिक शरीर श्रीरंगनाथस्वामी मंदिराच्या पाचव्या परिक्रमा-मार्गावर असलेल्या "श्री रामानुज मंदिराच्या" दक्षिण-पश्चिम कोपऱ्यात संरक्षित आहे. स्वामी रामानुजाचार्य १२० वर्षे आयुष्य जगले.... सन ११३७ साली त्यांनी पद्मासन अवस्थेत समाधी घेतली होती. स्वतः श्रीरंगनाथस्वामींच्या आदेशानुसार, रामानुजाचार्यांच्या शिष्यांनी त्या अवस्थेत त्यांचे भौतिक शरीर जतन केले.
या संरक्षित शरीरात डोळे, नखे वगैरे स्पष्ट दिसतात. या शरीरावर कुजण्यापासून संरक्षण करण्यासाठी दररोज कोणताही अभिषेक केला जात नाही. वर्षातून दोनदा हे शरीर औषधी वनस्पतींनी स्वच्छ केले जाते आणि त्या वेळी शारीरिक शरीरावर

चंदन आणि केशर लावले जाते. हे उल्लेखनीय आहे की या पवित्र स्थानाचा प्रचार गोवा किंवा इजिप्त सारखा केला जात नाही. रामानुजाचार्यांनी वापरलेला. एक खोका आपण अजूनही आत बघू शकता मंदिर.
© मिलिंद चिंचोळकर

Monday, September 6, 2021

षष्ठी स्थानकाची कहाणी

ऐका महादेवा तुमचे नाव दिलेल्या गावाची कहाणी. आटपाट नगर होते. गावाला सुंदर समुद्र किनारा होता. हिरवाईने नटले होते. कोणा एका राजाला आपली राजधानी महिकापुरीहून येथे हलविण्याचे मनात आले. राजाच तो. त्याच्या मनात आल्यावर त्याने आपल्या सरदारांना ते गाव राजधानीसाठी तयार करायला पाठविले. गावाची पहिली गरज पाण्याची त्यासाठी गावात साठ तळी खोदण्यास सांगितली. मुख्य तळ्याकाठी राजवाडा बांधला. हा मुख्य तलाव हत्तींना पोहण्यासाठी मोठा प्रशस्त बांधला. सर्व तळ्याकाठी महादेवाची मंदिरे बांधली. मुख्य तळ्याकाठी मोठी महादेवाची पिंडी असलेले मंदिर बांधले. तळ्याच्या मध्यभागीही मंदिर बांधले. हे मंदिर तळे भरल्यावर पाण्याखाली गेले, म्हणून त्याच्या कळसावर महादेवाची पिंडी ठेवली. तळ्याकाठी मंदिरे बांधली. महादेवाच्या कृपेने गावाची भरभराट झाली. गावात मोठे वाडे होते, त्यात विहिरी होत्या. साठ तळ्यांच्या कृपेने बारा महिने त्यांना पाणी होते. 


अनेक वर्षे लोटली. या गावावर विलायतेतल्या पोर्तुगीजांचे राज्य आले. या साहेबाने मंदिरे पाडून त्याची भर घालून मुख्य तळे बुजविले. त्या मंदिरांच्या अवशेषांवर मोठे गिरिजाघर बांधले. पण मुख्य महादेवाचे मंदिर तसेच ठेवले. नंतर विंग्रजांचे राज्य आले. तेही जाऊन आपल्याच लोकांचे राज्य आले. गावाला नळाने पाणीपुरवठा होऊ लागला. विहिरी वापराविना ओसाड पडल्या. आता लोकांना पाणी देणाऱ्या तळ्यांचे महत्व वाटेनासे झाले. विकासाच्या नावाखाली तळी बुजवली गेली. हत्तींना पोहण्यासाठी बांधलेला प्रशस्त मुख्य तलाव तर अर्ध्याहून अधिक बुजविला गेला. दसऱ्याला सीमोल्लंघनासाठी जात असत त्या घंटाळी देवीच्या तलावाचा तर मागमूसही राहिला नाही. 


काळ पुढे जात होता. आता लोकांना तळ्याचे महत्व कळू लागले होते. पण बुजविलेल्या तलावांवर इमारती उभ्या होत्या, काही तलावांवरून रस्ते केले होते. मग आता शहराचे 'षष्ठी स्थानक' किंवा 'श्री स्थानक' नाव कसे सिद्ध करायचे हा प्रश्न प्रशासनापुढे पडला. पण प्रशासनातील हुशार माणसांनी त्यावर मार्ग काढला. गावातील आता प्रशस्त झालेल्या रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडतील अशी व्यवस्था केली. पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साठेल आणि नागरिक त्यालाच तलाव मानतील अशी ही युक्ती होती. यामुळे शहराचे 'षष्ठी स्थानक' नाव परत दिमाखाने झळकू लागले आणि नागरिक संतुष्ट झाले. असे सर्व भारतवर्षातील नागरिक संतुष्ट होवोत.  ही साठा उत्तराची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण 

पेव (बळद)

 मुघली आक्रमणे आली की प्रथम धनधान्याची लुट करून घेऊन जायचे. वर्षभर शेतात राबराब राबून निर्माण झालेले धान्य गेले तर वर्षभर उदरनिर्वाह कसा करायचा ही मोठी समस्या त्याकाळी होती. म्हणून आपल्या पूर्वजांनी वाड्यातच जमीनीखाली गुप्तपणे धान्य साठविण्याची पेव / बळद निर्माण केले.


सुगीच्या वेळी सर्वच शेतकऱ्यांचा मला तयार झाल्यामुळे बाजारातील आवक वाढते, त्यामुळे भाव पडतात. अशा वेळी काही व्यापारी मोठ्याप्रमाणावर माल खरेदी करून ठेवतात. साठवलेला माल पुढे ते चढ्या भावाने विकतात. म्हणून आपल्या पूर्वजांनी व्यापाऱ्यांचा धूर्तपण ओळखून व बाजारपेठेच्या या चढउतारापासून स्वताचे संरक्षण करण्यासाठी व धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी पेव / बळद निर्माण केले.

धान्य साठवण्याच्या बाबतीत पूर्वी दोन प्रकार होते. १) लहान प्रमाणावरील साठवण २) मोठ्या प्रमाणावरील साठवण हे दोन्ही प्रकार प्राचीन काळापासून प्रचलित आहेत. लहान प्रमाणावरील साठवणीत मुख्यता पोती, मातीची भांडी, कणग्या, तांब्या पितळेचे डबे, पत्र्यांचे पिंपे अश्या साधनांचा वापर करत. मोठ्या प्रमाणावरील साठवणुकीसाठी पेव (बळद) चा उपयोग करत. पेव म्हणजे जमिनीमधून पाणी झिरपून आत येणार नाही असे तयार केलेले तळघर. पेव म्हणजे जणू एखादा भलामोठा रांजनच.


जमिनीमध्ये ठराविक खोलीपर्यंत विहिरी सारखा गोल खड्डा खणतात. त्यामध्ये प्रथम दोन फुट उंचीपर्यंत दगडांचे सोलिंग करत. त्यावर जाड मुरूम टाकून परत वाळू टाकली जात असे. वाळूच्या वर माती, शेण, राख, पांढरी माती, लाल माती यांचे मिश्रण करून लिंपन करत. त्यावर दंडगोलाकार किंवा घुमटाकार विट बांधकाम किंवा मातीच्या भेंड्याचे बांधकाम करत. पेव तयार करताना वापरावयाची माती ही सर्व निकष लागून तपासत असत. पेव आतून शेणामातीने लिंपले जात असे. अशी साधारणतः पेवांची रचना असे.

चिकण माती महत्वाची

पेव मुख्यतः पांढऱ्या शुभ्र असलेल्या मातीतच सुरक्षित होऊ शकते हे आपल्या पूर्वजांना ज्ञात होते. कारण ह्या मातीत पावसाचे किंवा अन्य मार्गाने आलेले पाणी कमी झिरपते. वरील सर्व घटकामध्ये पांढरी चिकण माती महत्वाची. ही माती ढासळत नाही. अशा मातीचा थर वजन पेलू शकते. म्हणून तर आत पोकळी असली तरी पेव ढासळत नाहीत. अशा पेवांजवळ धान्यांनी भरलेल्या पोत्यांची बैलगाडी पेवापर्यंत आणत. इतक वजन पेलून धरण्याची क्षमता या मातीमध्ये असते. या मातीमधून पाणी झिरपत नाही त्यामुळे आतल्या धान्याला ओल लागत नाही.

पेवांची रचना


सर्वात वर चार- सहा फुटांच्या थरात पेवांचे तोंड सरळ उभट असते. ते सर्व बाजूंनी बांधून घेतले जाते. त्याच्या खाली या तोंडापेक्षा थोडा कमी व्यासाचा मार्ग असतो. तिथ आढी बांधतात. या ठिकाणी पेवाचं झाकण असत. आढी म्हणजे विटांचे बांधकाम. पेवाचे तोंड आयताकृती दगडाने किंवा रफ शहाबाद फरशीने बंद केले जाते. त्यावर कडबा / गवत /माती टाकून तोंड बुजवून टाकतात. जेणेकरून आत मध्ये वॉटरप्रूफ बनते. पेवाचा व्यास पंधरा फुटांपासून ते सत्तर फुटापर्यंत किंवा त्याही पेक्षा जास्त असतो. व उंची दहा फुटांपासून ते जमिनीमध्ये हार्ड स्टाटा लागेपर्यंत.

धान्य भरण्याची पद्धत

धान्य भरण्याच्या वेळेस अगोदर तेथे संपूर्ण पेव शेणामातीच्या मिश्रणाने सारवून घेतात. तळाशी उसाच्या वाळलेल्या पेंढ्या टाकतात. त्यावर शिंदीच्या पानांपासून तयार केलेल्या चटया अंथरतात. मधल्या भागात धान्याची पोती रिती करतात. जसजसे धान्य भिंतीच्या कडेला येईल त्याबाजूने उसाच्या पेंढ्याचा थर वाढवत नेतात. पेवाच्या झाकणापासून खाली कमीत कमी चार फुटाचा थर मोकळा ठेवला जातो. त्याच्या खालपर्यंत धान्य भरले जाते. एका पेवात साधारणत १५० ते २५० क्विंटल धान्य मावते.

धान्य साठवण्याचे फायदे

पेवात धान्य साठवले की जास्त दिवस टिकते त्याचा दर्जा सुधारतो. धान्याला कीड लागत नाही, कारण तिथे ऑक्सिजन नसतो. धान्य बाहेर काढण्याच्या वेळी पेवाचे तोंड मोकळे करून बराच वेळेपर्यंत तसेच उघडे ठेऊन पेवात बाहेरची मोकळी हवा मिसळू देतात. ऑक्सिजनचा पुरवठा पूर्ववत होण्यासाठी साधारणतः बारा ते आठरा तास लागतात. त्यायोगे पेवातील दूषित हवा सुधारते. एखादे पेव सकाळी उघडले की दुपारी किंवा दुसऱ्या दिवशी त्यात पूर्ण हवा खेळलेली आणि पुरेसा ऑक्सिजन जमा झाला असल्यावरच धान्य काढण्यासाठी आत उतरत असत. त्यासाठी एक परीक्षा घेत असत. त्यात कंदील सोडला जातो. त्याची ज्योत टिकली की धान्य काढण्यासाठी माणूस आत उतरत असे. तोपर्यंत कोणी आत जाऊ शकत नसे. गेलाच तर ऑक्सिजन अभावी त्याचा मृत्यू ओढवतो. पेवात चांगलीच उष्णता असते. आतील धान्य काढण्यासाठी एकच व्यक्ति आत सहज प्रवेश करू शकेल एवढाच मार्ग असायचा. ग्रामीण भागातील आजही नवीन इमारतीचे बांधकाम करताना अशी अनेक पेव आढळून येतात.

"वाडा" या पुस्तकातून

विलास भि. कोळी

संपर्क :- 9763084499