Sunday, August 28, 2016

भारतीय रुपया : फेसबुकवरील एक पोस्ट

भारतीय मुद्रा (रुपया ₹) से जुड़े 31 ग़ज़ब रोचक तथ्य
.
1. भारत में करंसी का इतिहास2500 साल पुराना हैं। इसकी शुरूआत एक राजा द्वारा की गई थी।
.
2. अगर आपके पास आधे से ज्यादा (51 फीसदी) फटा हुआ नोट है तो भी आप बैंक में जाकर उसे बदल सकते हैं।
.
3. बात सन् 1917 की हैं, जब 1₹ रुपया 13$ डाॅलर के बराबर हुआ करता था। फिर 1947 में भारत आजाद हुआ, 1₹ = 1$ कर दिया गया. फिर धीरे-धीरे भारत पर कर्ज बढ़ने लगा तो इंदिरा गांधी ने कर्ज चुकाने के लिए रूपये की कीमत कम करने का फैसला लिया उसके बाद आज तक रूपये की कीमत घटती आ रही हैं।
.
4. अगर अंग्रेजों का बस चलता तो आज भारत की करंसी पाउंड होती. लेकिन रुपए की मजबूती के कारण ऐसा संभव नही हुआ।
.
5. इस समय भारत में 400 करोड़ रूपए के नकली नोट हैं।
.
6. सुरक्षा कारणों की वजह से आपको नोट के सीरियल नंबर में I, J, O, X, Y, Z अक्षर नही मिलेंगे।
.
7. हर भारतीय नोट पर किसी न किसी चीज की फोटो छपी होती हैं जैसे- 20 रुपए के नोट पर अंडमान आइलैंड की तस्वीर है। वहीं, 10 रुपए के नोट पर हाथी, गैंडा और शेर छपा हुआ है, जबकि 100 रुपए के नोट पर पहाड़ और बादल की तस्वीर है। इसके अलावा 500 रुपए के नोट पर आजादी के आंदोलन से जुड़ी 11 मूर्ति की तस्वीर छपी हैं।
.
8. भारतीय नोट पर उसकी कीमत 15 भाषाओंमें लिखी जाती हैं।
.
9. 1₹ में 100 पैसे होगे, ये बात सन् 1957 में लागू की गई थी। पहले इसे 16 आने में बाँटा जाता था।
.
10. RBI, ने जनवरी 1938 में पहली बार 5₹ की पेपर करंसी छापी थी. जिस पर किंग जार्ज-6 का चित्र था। इसी साल 10,000₹ का नोट भी छापा गया था लेकिन 1978 में इसे पूरी तरह बंद कर दिया गया।
.
11. आजादी के बाद पाकिस्तानने तब तक भारतीय मुद्रा का प्रयोग किया जब तक उन्होनें काम चलाने लायक नोट न छाप लिए।
.
12. भारतीय नोट किसी आम कागज के नही, बल्कि काॅटन के बने होते हैं। ये इतने मजबूत होते हैं कि आप नए नोट के दोनो सिरों को पकड़कर उसे फाड़ नही सकते।
.
13. एक समय ऐसा था, जब बांग्लादेश ब्लेड बनाने के लिए भारत से 5 रूपए के सिक्के मंगाया करता था. 5 रूपए के एक सिक्के से 6 ब्लेड बनते थे. 1 ब्लेड की कीमत 2 रूपए होती थी तो ब्लेड बनाने वाले को अच्छा फायदा होता था. इसे देखते हुए भारत सरकार ने सिक्का बनाने वाला मेटल ही बदल दिया।
.
14. आजादी के बाद सिक्के तांबे के बनते थे। उसके बाद 1964 में एल्युमिनियम के और 1988 में स्टेनलेस स्टील के बनने शुरू हुए।
.
15. भारतीय नोट पर महात्मा गांधीकी जो फोटो छपती हैं वह तब खीँची गई थी जब गांधीजी, तत्कालीन बर्मा और भारत में ब्रिटिश सेक्रेटरी के रूप में कार्यरत फ्रेडरिक पेथिक लॉरेंस के साथ कोलकाता स्थित वायसराय हाउस में मुलाकात करने गए थे। यह फोटो 1996 में नोटों पर छपनी शुरू हुई थी। इससे पहले महात्मा गांधी की जगह अशोक स्तंभ छापा जाता था।
.
16. भारत के 500 और 1,000 रूपये के नोट नेपालमें नही चलते।
.
17. 500₹ का पहला नोट 1987 में और 1,000₹ पहला नोट सन् 2000 में बनाया गया था।
.
18. भारत में 75, 100 और 1,000₹ के भी सिक्के छप चुके हैं।
.
19. 1₹ का नोट भारत सरकार द्वारा और 2 से 1,000₹ तक के नोट RBI द्वारा जारी किये जाते हैं.
.
20. एक समय पर भ्रष्टाचार से लड़ने के लिए 0₹ का नोट 5thpillar नाम की गैर सरकारी संस्था द्वारा जारी किए गए थे।
.
21. 10₹ के सिक्के को बनाने में 6.10₹ की लागत आती हैं.
.
22. नोटो पर सीरियल नंबर इसलिए डाला जाता हैं ताकि आरबीआई(RBI) को पता चलता रहे कि इस समय मार्केट में कितनी करंसी हैं।
.
23. रूपया भारत के अलावा इंडोनेशिया, मॉरीशस, नेपाल, पाकिस्तान और श्रीलंका की भी करंसी हैं।
.
24. According to RBI, भारत हर साल 2,000 करोड़ करंसी नोट छापता हैं।
.
25. कम्प्यूटर पर ₹ टाइप करने के लिए ‘Ctrl+Shift+$’ के बटन को एक साथ दबावें.
.
26. ₹ के इस चिन्ह को 2010 में उदय कुमार ने बनाया था। इसके लिए इनको 2.5 लाख रूपयें का इनाम भी मिला था।
.
27. क्या RBI जितना मर्जी चाहे उतनी कीमत के नोट छाप सकती हैं ?
ऐसा नही हैं, कि RBI जितनी मर्जी चाहे उतनी कीमत के नोट छाप सकती हैं, बल्कि वह सिर्फ 10,000₹ तक के नोट छाप सकती हैं। अगर इससे ज्यादा कीमत के नोट छापने हैं तो उसको रिजर्व बैंक ऑफ इंडिया एक्ट, 1934 में बदलाव करना होगा।
.
28. जब हमारे पास मशीन हैं तो हम अनगणित नोट क्यों नही छाप सकते ?
हम कितने नोट छाप सकते हैं इसका निर्धारण मुद्रा स्फीति, जीडीपी ग्रोथ, बैंक नोट्स के रिप्लेसमेंट और रिजर्व बैंक के स्टॉक के आधार पर किया जाता है।
.
29. हर सिक्के पर सन् के नीचे एक खास निशान बना होता हैं आप उस निशान को देखकर पता लगा सकते हैं कि ये सिक्का कहाँ बना हैं.
.
*.मुंबई – हीरा [◆]
*.नोएडा – डाॅट [.]
*.हैदराबाद – सितारा [★]
*.कोलकाता – कोई निशान नहीं.
.
30. जानिए, एक नोट कितने रूपयें में छपता हैं।
*.1₹ = 1.14₹
*.10₹ = 0.66₹
*.20₹ = 0.94₹
*.50₹ = 1.63₹
*.100₹ = 1.20₹
*.500₹ = 2.45₹
*.1,000₹ = 2.67₹
.
31. रूपया, डाॅलर के मुकाबले बेशक कमजोर हैं लेकिन फिर भी कुछ देश ऐसे हैं, जिनकी करंसी के आगे रूपया काफी बड़ा हैं आप कम पैसों में इन देशों में घूमने का लुत्फ उठा सकते हैं.
*.नेपाल (1₹ = 1.60 नेपाली रुपया)
*.आइसलैंड (1₹ = 1.94 क्रोन)
*.श्रीलंका (1₹ = 2.10 श्रीलंकाई रुपया)
*.हंगरी (1₹ = 4.27 फोरिंट)
*.कंबोडिया (1₹ = 62.34 रियाल)
*.पराग्वे (1₹ = 84.73 गुआरनी)
*.इंडोनेशिया (1₹ = 222.58 इंडोनेशियन रूपैया)
*.बेलारूस (1₹ = 267.97 बेलारूसी रुबल)
*.वियतनाम (1₹ = 340.39 वियतनामी डॉन्ग).
.
.
भारतीय मुद्रा प्रणाली का संशिप्त विवरण
.
OLD INDIAN CURRENCY SYSTEM..
Phootie Cowrie to Cowrie
Cowrie to Damri
Damri to Dhela
Dhela to Pie
Pie to to Paisa
Paisa to Rupya
256 Damri = 192 Pie = 128 Dhela = 64 Paisa (old) = 16 Anna = 1 Rupya
.
Now u know how some of the indian sayings originated..
ek 'phooti cowrie' nahin doonga...
'dhele' ka kaam nahin karti hamari bahu...
chamdi jaye par 'damdi' na jaye...
'pie pie' ka hisaab rakhna...

Saturday, August 27, 2016

वार : भारतीय शास्त्रशुद्ध कल्पना

आजपर्यंत वार ही  पाश्चिमात्य कल्पना असून त्याला  शास्त्रीय (खगोलशास्त्रीय) आधार नाही अशी माझी कल्पना होती.
परंतु फेसबुकवरील NL Soli  यांच्याकडून मौल्यवान माहिती मिळाली.
ती आपल्यापर्यंत पोचविण्यासाठी हा प्रयत्न
-----------------------------------------------------------------------------

वार (आणि तास) हा प्राचीन भारताने जगाला दिलेला विचार आहे. होरा या कालविभागापासून वाराची उत्पत्ती झाली. एका अहोरात्रीचे म्हणजे दिवसाचे २४ समान भाग केले असता त्यातील एक भाग म्हणजे होरा. 'होरा' या शब्दाचा अपभ्रंश होऊन इंग्रजीत Hour हा शब्द आला. प्रत्येक होर्‍याला कुठलातरी ग्रह अधिपती (होरेश) असतो. त्याचे नांव वाराला दिले आहे.

सूर्यसिद्धान्त या ग्रंथात भूगोलाध्याय या विभागात पुढील वर्णन आहे.
मन्दादधः: क्रमेण स्युश्चतुर्था दिवसाधिपा:। होरेशा: सूर्यतनयादधोधः क्रमशस्तथा॥
तसेच "उदयात्‌ उदयेत्‌ वारः" एका सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंतचा कालावधी तो वार असा या सूत्राचा अर्थ आहे.
धार्मिक सोयींसाठी हिंदू पंचांगात सूर्योदयापासून दिवसाचा व वाराचा प्रारंभ होतो असे समजले जाते. मुसलमानी हिजरी पद्धतीनुसार सूर्यास्ताला नवीन वार सुरू होतो तर, इंग्रजी गेगोरियन आंतरराष्ट्रीय कालगणनेनुसार मध्यरात्री बारा वाजता नवीन वाराची सुरुवात होते. असे असले तरी, तिन्ही पद्धतींनुसार सूयोदयापासून सूर्यास्तापर्यंत एकच एक समान वार असतो.
"आमंदात्‌ शीघ्रपर्यंतम् होरेशा:" असे वारांचे सूत्र आहे. म्हणजे मंद ग्रहापासून शीघ्र ग्रहापर्यंत होर्‍यानुसार.

मंदग्रह ते शीघ्र ग्रह असे आहेत --
  • शनी
  • गुरू
  • मंगळ
  • रवी
  • शुक्र
  • बुध
  • चंद्र

प्रत्येक ग्रहाचा एक होरा असतो.
शनिवारी पहिला होरा अथवा तास हा शनीचा, पुढील तास गुरूचा, तिसरा मंगळाचा, चौथा रवीचा, पाचवा शुक्राचा, सहावा बुधाचा, सातवा चंद्राचा. याप्रमाणे तीन वेळा २१ होरे झाल्यावर २२वा पुन्हा शनीचा, २३वा गुरूचा, २४वा मंगळाचा येतो. असे २४ तास पूर्ण होतात. त्यानंतर दुसरा दिवस रवीच्या होर्‍याने सुरू होतो शनिवारनंतर रविवार येतो. पुन्हा २४ होरे मोजले की तिसर्‍र्‍या दिवसाचा पहिला होरा चंद्राचा म्हणजे सोमाचा. म्हणून रविवारनंतरचा वार सोमवार.

Saturday, August 20, 2016

कृष्ण : एक कुशल नेता

मागील वर्षी गोकुळाष्टमीच्या सुमारास 'विकास पुरुष' कृष्णाबद्दल माहिती घेतली. यादवांचे गोकुळातून द्वारकेच्या बंदरावर स्थलांतर हे त्यांना त्यांच्या गोपालनाच्या व्यवसायातून बाहेर काढून आयात-निर्यातीच्या व्यापारात आणण्यासाठी उपयुक्त ठरले आणि अल्पावधीतच द्वारका सोन्याची झाली.

कृष्णाचे युद्धतंत्रही अद्वितीय होते. दुर्योधनाने महाभारत युद्धात यादव सेना घेतली आणि कृष्ण अर्जुनाचा सारथी बनला. युद्धात सेनेपेक्षा नेतृत्व महत्वाचे ठरते हे अर्जुनाला पूर्णपणे माहित होते. दुर्योधनाने हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर घेतले पण त्या हार्डवेअर/सॉफ्टवेअरचा निर्माता अर्जुनाकडे ठेवला. या निर्मात्याला हे हार्डवेअर/सॉफ्टवेअर कसे जॅम करायचे याची माहिती असणार हे दुर्योधन विसरला.

या युद्धात बलरामाची सहानुभूती दुर्योधनाकडे होती. यादवांच्या सेनेचे नेतृत्व बलरामाने केले असते. अशा परिस्थितीत ही सेना पांडवांना भारी ठरू शकली असती. कृष्णाने बलरामाला पटवून दिले की ही युद्ध अधर्माने होणार आहे आणि त्याच्यासारख्या धार्मिक माणसाने त्यापासून दूर राहिले पाहिजे. बलराम त्यामुळे तीर्थयात्रेला निघून गेला.

युद्धापूर्वीच कृष्णाने पुर्वेपासुन पश्चिमेपर्यंत स्वत: आणि पांडवांना लग्नसंबंध जोडून आपलेसे करून घेतले होते. जरासंधाचे मगध हे अत्यंत बळकट साम्राज्य होते. भरतील अनेक राज्ये त्यांना खंडणी देत असत. अनेक राजांना जरासंधाने तुरुंगात ठेवले होते. कंस हा 'शूरसेन' या यादवांच्या संस्थानाचा राजा होताच, पण जरासंधाचा सेनापती होता. त्याला मारून कृष्णाने जरासंधाशी वैर घेतले होते. जरासंधाशी कृष्णाशी अठरा युद्धेही झाली होती आणि प्रत्येक युद्धात कृष्णाला काही प्रदेश गमवावा लागला होता (गोकुळ द्वारकेला हलविण्यामागे हे  ही एक कारण होते). मगध साम्राज्याशी युद्ध करणे शहाणपणा नसल्याने राजसूय यज्ञ प्रसंगी कृष्णाने जरासंधाला भीम अथवा अर्जुनाशी एकट्याने मल्लयुद्ध करण्याचे आव्हान दिले. कृष्णाला माहित होते की जरासंध अर्जुनाला आपल्यासामान लेखित नाही. अपेक्षेप्रमाणे त्याने भीमाशी मल्लयुद्धाचे आव्हान स्वीकारले आणि भीमाने त्यात जरासंधाला ठार मारले. कृष्णाने जरासंधाच्या मुलाला राज्यावर बसविले आणि एक प्रबळ साम्राज्य आपल्या मित्रांच्या यादीत जोडले. तसेच जरासंधाने बंदिवासात ठेवलेल्या राजांना सोडून दिले आणि त्यांना मित्र बनविले. याच राजसूय यज्ञात कृष्णाने जरासंधाचा तेव्हाचा (कंसानंतर झालेला) सेनापती जयद्रथ यालाही एकट्याला गाठून मारले.

राजसूय यज्ञापूर्वी झालेले प्रबळ यवन राजा (यवन प्रदेशातील राजा - सोबतचा नकाशा पहा) कालयवन  याचे  आक्रमण त्याने कसे थोपविले हे मागील लेखात विस्तृत लिहिले आहे.

कृष्णाचे हेरखातेही सक्षम होते. युद्धाला दहा दिवस लोटले तरी एकही पांडव ठार झाला नाही हे पाहून दुर्योधन अस्वस्थ झाला. त्याने कौरवांचे सेनापती पितामह भीष्म यांची भेट घेऊन निर्भत्सना केली. भीष्मांना पांडव जवळचे वाटत असल्यानेच ते मनापासून युद्ध करीत नाहीत असे वक्तव्य केले. यामुळे भीष्म व्यथित झाले. त्यांनी एका दिवसात सर्व पांडवांना ठार मरीन अथवा सेनापतीपद सोडेन अशी प्रतिज्ञा केली. आपल्या हेरांकरवी कृष्णाला हे कळताच तो चिंतीत झाला. भीष्मांच्या युद्धकौशल्याची त्याला कल्पना होती. तसेच 'भीष्मप्रतिज्ञा' ही  काय चीज असते हे ही त्याला माहित होते. त्याने द्रौपदीबरोबर भीष्मांना भेटण्याचे ठरविले. कौरवांच्या छावणीत हेरांचा सुळसुळाट असल्याने कोणालाही प्रवेश नव्हता. कृष्णाने एका गरीब शेतकऱ्याचा वेश घेतला. द्रौपदीलाही शेतकरणीचा वेश दिला. ते दोघे भीष्मांच्या छावणीत प्रवेश करू लागले. द्वारपालांनी त्यांना अडविले. कृष्णाने गयावया केल्या. परंतु द्वारपालाने त्याला लाथा-बुक्क्यांनी मारले. नंतर दया येऊन फक्त द्रौपदीला आत सोडले. आत भीष्म ध्यानस्त बसले होते. द्रौपदीने त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार केला. इतक्या रात्री दुर्योधानाचीच पत्नी आली असणार असे समजून भीष्मांनी 'सौभाग्यवती भव' असा आशीर्वाद दिला. डोळे उघडल्यावर त्यांनी द्रौपदीला ओळखले. कोणाबरोबर इतक्या रात्री आलीस असे विचारल्यावर तिने 'एका शेतकऱ्याबरोबर' असे उत्तर दिले. परंतु भीष्मांनी ओळखले. त्यांनी छावणीबाहेर येऊन कृष्णाचे पाय धरले आणि सन्मानाने आत नेले. भीष्मांनी द्रौपदीला 'सौभाग्यवती भव' आशीर्वाद दिल्याने तो खोटा ठरणार नाही असे कृष्णाने भीष्माचार्यांना सांगितले. भीष्मांनी तर दुसऱ्या दिवशी सर्व पांडवांना मारण्याची प्रतिज्ञा घेतली होती. आणि भीष्म हे पराक्रमात पांडवांना भारी ठरणारे होते. त्यामुळे कृष्णाने उपाय विचारला. तेव्हा शिखंडीआडून अर्जुनाने बाण सोडल्यास भीष्म प्रतिकार करणार नाहीत असे भीष्मांनी सांगितले. 'शिखंडी तारुण्यात येईपर्यंत स्त्री म्हणून वाढला. नंतर एका यक्षाने त्याला पौरुषत्व दिले. पण भीष्म त्याला 'स्त्री ' मानीत असल्याने ते शिखंडीवर बाण सोडणार नाहीत'  असे भीष्मांनी कृष्णाला सांगितले. या रहस्याचा वापर करून कृष्णाने भीष्मांना शरपंजरी केले.

यानंतर कौरवांचा सेनापती झालेल्या कर्णावर (तेव्हाच्या युद्धशास्त्राच्या नियमाविरुद्ध जावून) तो नि:शस्त्र अवस्थेत असताना आणि रथातून पायउतार झालेल्या अवस्थेत बाण सोडण्यास अर्जुनाला सांगितले.

त्यानंतर कौरवांचा सेनापती झालेल्या द्रोणांवर अश्वत्थामा गेल्याचे धर्माकडून वदवून ते नि:शस्त्र अवस्थेत प्रार्थना करीत असता दृश्द्युम्नामार्फत हल्ला करून मारले. यावेळी भीम आणि अन्य पांडव दृष्ट्द्युम्नावर धावून गेले. परंतु कृष्णाने त्यांना आवरले.

युद्धाच्या समाप्तीनंतर दुर्योधन हा एकाच कौरव जिवंत राहिला होता. कृष्णाने त्याला भीमाबरोबर गदायुद्धाचे आव्हान दिले. यात दुर्योधनाची जीत होते आहे असे दिसल्यावर त्याने भीमाला कमरेखाली गदा मारण्याची खुण केली आणि भीमाने दुर्योधनाला मारले. या अधर्माने झालेल्या गदायुद्धाने या युद्धाचा पंच असलेला बलराम खवळला आणि भीमाला मारण्यास धावला. परंतु कृष्णाने त्याला आवरले.

युद्ध केवळ पराक्रमाने नव्हे तर पद्धतशीर योजना आखून जिंकता येते याची जाणीव असलेला कृष्ण महाभारतात एक यशस्वी नेता म्हणूनच वावरतो.




Friday, August 12, 2016

भाारत

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ही पोस्ट..........
857 ते 1947 पर्यंत अखंड भारत सात देशांत विभागला गेला. वर्ष
1947 मध्ये झालेली भारत पाकिस्तान फाळणी ही मागील
2500 वर्षांतील देशाची 24 वीं फाळणी होती.
इतिहासात हा उल्लेखच नाही
ज्या राजांनी, शक्तींनी मागील 2500 हजार वर्षांत
भारतावर आक्रमण केले त्यांनी अफगानिस्तान, मॅनमार,
श्रीलंका, नेपाळ, तिबेत, भूटान, पाकिस्तान, मालद्वीप
किंवा बांग्लादेशावर आक्रमण केल्याचा उल्लेख
इतिहासातील कुठल्याच ग्रंथात नाही. त्यामुळे हे देश म्हणून
अखंड भारत असावे याला पुष्टी मिळते. पाकिस्तान आणि
बंगलादेशाची निर्मिती कशी झाली याचा इतिहास
सर्वांनाच माहिती आहे. परंतु, भारताचे तुकडे होऊन इतर देश कसे
निर्माण झाले, याची फारशी माहिती कुणाला नाही.
अशी होती अखंड भारताची सीमा
उत्तरेकडे हिमालय आणि दक्षिणेकडे हिंद महासागर या
भारताच्या सीमा होत्या, असा उल्लेख प्राचीन इतिहासात
आहे. परंतु, पूर्व आणि पश्चिमेच्या सीमेची काहीही माहिती
नाही. कैलास मानसरोवरवरून पूर्वेकडे गेले की, आताचा
इंडोनेशिया आणि पश्चिमेकडे गेले की इराण हा आर्यान प्रदेश
हिमालयाच्या अंतिम टोकाला आहे. अॅटलस यांच्या
मतानुसार, जेव्हा आपण पूर्व व पश्चिमेकडून श्रीलंका किंवा
कन्याकुमारीला पाहू तेव्हा लक्षात येईल की, हिंद महासागर
हा इंडोनेशिया व आर्यान (इराण) पर्यंतच आहे. या संगमानंतर
महासागराचे नाव बदलते. या प्रकारे हिमालय, हिंद महासागर,
आर्यान (इराण) आणि इंडोनेशियाच्या मधातील संपूर्ण भू-
भागाला हा आर्यावर्त किंवा भारतवर्ष असे म्हटले जात असे.
आतापर्यंत 24 विभाजन
राइट विंग इतिहासकारांनुसार, वर्ष 1947 मध्ये भारत-पाक
फाळणी झाली. मागील 2500 वर्षांत हे भारताचे 24 वे
विभाजन होते. इंग्रजांच्या उल्लेखानुसार 1857 ते 1947 पर्यंत
भारताची ही सातवी फाळणी आहे. 1857 मध्ये भारताचे
क्षेत्रफळ 83 लाख वर्ग किमी होते. आताचे क्षेत्रफळ 33 लाख
वर्ग किमी आहे. भारताच्या शेजारील राष्ट्रांचे क्षेत्रफळ 50
लाख वर्ग किमी आहे.
काय आहे अखंड भारत
आज भारताच्या चारही बाजूने असलेले देशांत 1800 वर्षांपूर्वी
बोली, संस्कृती, नृत्य, पूजापाठ, पंथ, वेशभूषा, संगीत सर्वच
भारतासाखरे होते. परंतु, परराष्ट्राचा संपर्क आल्याने त्यांची
संस्कृती बदलली.
2500 वर्षांत भारतावर झालेले हल्ले
मागील 2500 वर्षांत भारतावर अनेक अक्रमणे झाली. यामध्ये
यूनानी, यवन, हूण, शक, कुषाण, र्तगाली, फ्रेंच, डच आणि
इंग्रेजांचा समावेश आहे. या सर्वांत इतिसाहात उल्लेख आहे.
परंतु, या काळात अफगानिस्तान, मॅनमार, श्रीलंका, नेपाळ,
तिब्बेट, भूटान, पाकिस्तान, मालद्वीप किंवा बांग्लादेशावर
आक्रमण झाल्याचा उल्लेख नाही.
रशिया आणि इंग्रजांनी बनवला अफगानिस्तान
26 मे 1876 रोजी रशिया आणि ब्रिटिश शासनामध्ये 'गंडामक
संधी' नावाचा करार झाला. त्या आधारे अफगानिस्तान
नावाचा नवा देश स्थापन झाला. पूर्वी हा देश भारताचाच
भाग होता. या करारामुळे तो भारतापासून वेगळा झाला. या
प्रदेशात राहणारे प्राचीन काळात शैव पंथीय होते. नंतर त्यांनी
बुद्ध धम्म स्वीकारला. पुढे ते मुस्लीम झाले. सम्राट शाहजहान,
शेरशाह सुरी आणि महाराजा रणजित सिंह यांच्या
शासनकाळात कंधार (गंधार) चा स्पष्ट उल्लेख आहे.
1904 मध्ये दिला स्वतंत्र देशाचा दर्जा
पृथ्वी नारायण शाह यांनी मध्य हिमालयाच्या परिरातील
लहान लहान 46 राज्यांना एकत्र करून नेपाळ नावाचे राज्य
तयार केले होते. इंग्रजांनी वर्ष 1904 मध्ये या डोंगरवस्तीतील
राजांसोबत करार करून नेपाळला स्वतंत्र देशाचा दर्जा प्रदान
केला. या प्रकारे नेपाळचे भारतापासून विभागाजन झाले.
इंग्रजांच्या खेळीमुळे भूटान भारतापासून वेगळे
1906 मध्ये इंग्राजांनी भारताच्या ज्या भागाला
भारतापासून तोडले. तोच आज भूटान. इसवी सन सहाव्या
शतकापासून या देशाने बौद्ध धर्माचा अंगीकार केला.
कसा तयार झाला तिबेट
वर्ष 1914 मध्ये तिबेटला केवळ एक पक्ष मानत भारतातील
ब्रिटिश सरकार आणि चीनमध्ये एक करार झाला. त्या अंतर्गत
तिबेटला एक बफर राज्य म्हणून मान्यता देताना हिमालयला
विभाजित करण्यासाठी मॅकमोहन रेषा निर्माण करण्याचा
निर्णय झाला. यामध्ये हिमालयाची वाटणी करण्याचाही
डाव रचण्यात आला. पुढे चीनच्या साम्रज्यवादी भूमिकेमुळे
हा भाग चीनच्या ताब्यात गेला.
इंग्रजांनी दिली मान्यता
आपल्या नौसेनेला बळ देण्यासाठी इंग्रजांनी श्रीलंका आणि
नंतर मॅनमारला वेगळा देश म्हणून मान्यता दिली. ऐतिहासिक
आणि सांस्कृतिकदृष्ट्या हे दोन्ही देश भारताचा भाग होते.
भाषिक अस्मितेमुळे बंगलादेश
धर्माच्या आधारे 1947 मध्ये पाकिस्तानची निर्मिती झाली.
मात्र, पुढे भाषिक अस्मितेमुळे बंगाल भाषिकांनी 16 डिसेंबर
1971 ला पाकिस्तानपासून तुटून बांगलादेशाच्या
नावाखाली वेगळा देश निर्माण केला.