Saturday, March 2, 2019

अद्वैत वेदांत

वेदान्त नामम् उपनिषदम् प्रमाणम् |
वेदांत हे दर्शन उपनिषदांवर, त्यातील ज्ञानावर आधारलेले आहे. उपनिषदे ही वेदांचा भाग आहेत. वेद हे जगातील सर्वात प्राचीन वाङ्मय समजले जाते. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे चार वेद आहेत. वेदातील बराचसा भाग हा यज्ञविधींसंबंधी आहे. वेदांच्या शेवटी (कधीकधी मध्यभागीही) वेदांची अध्यात्मिक भूमिका स्पष्ट करणारे विभाग येतात. तेच 'उपनिषदे' होत. उपनिषदे बहुतेकवेळा वेदांच्या शेवटचा भाग असल्याने त्याला 'वेदांत' म्हणत असावेत. किंवा वेदांतील उच्चतम तत्व सांगणारे असल्याने ('अंत' हा शब्द 'उच्चतम' या अर्थानेही येतो) त्याला वेदांत म्हणत असावेत.
उपनिषदे अनेक आहेत. त्यातील दहा महत्वाची समजली जातात. ही महत्वाची समजण्याचे कारण म्हणजे त्यावर आद्य शंकराचार्यानी भाष्य केले आहे. इशोपनिषद, केनोपनिषद, कठोपनिषद, प्रश्नोपनिषद, ऐतरेय उपनिषद, तैत्तरीय उपनिषद, मुंडक उपनिषद, मांडुक्य उपनिषद, छांदोग्य उपनिषद, बृहदारण्यक उपनिषद ही ती दहा उपनिषदे होत. यातील मांडुक्य उपनिषद सर्वात लहान आहे तर बृहदारण्यक उपनिषद खूप मोठे आहे. काही उपनिषदे पद्यात (मंत्र) आहेत तर काही गद्यामध्ये आहेत. ती सुमारे तीन ते चार हजार वर्षांपूर्वीची असावीत. उपनिषदे 'अपौरुषेय' समजली जातात. म्हणजे ती कोणा  माणसाने रचलेली नसून प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांनी रचना केली आहे अशी श्रद्धा आहे. ऋषींना ध्यानावस्थेत आलेल्या अनुभवाचे ते सार आहे. हे ज्ञान त्यांना ध्यानावस्थेत मिळालेले असल्याने ते प्रत्यक्ष परमेश्वराने दिले असे मानतात.
उपनिषदांचा अर्थ भगवान कृष्णाने गीतेत सोप्या भाषेत उलगडून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ब्रह्मसूत्रे हे ही उपनिषदांचे सार मानले जाते. ब्रह्मसूत्रात ५५५ सूत्रे आहेत. प्रत्येक सूत्र अर्थाच्या दृष्टीने परिपूर्ण आहे. उपनिषदे हे काव्य आहे, ब्रह्मसूत्रे ही त्या उपनिषदांचे अत्यंत तर्कशुद्ध विवेचन आहे. आद्य शंकराचार्यांनी उपनिषदे, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्रे यावर भाष्य केले आहे. या तीन ग्रंथांना 'प्रस्थानत्रयी' असे नाव आहे. अद्वैत वेदांत दर्शन या प्रस्थानत्रयीच्या भक्कम पायावर उभे आहे. जर अद्वैत वेदांताचा  'तत्वज्ञान' या भूमिकेतून अभ्यास करायचा असेल तर 'ब्रह्मसूत्रें महत्वाची ठरतात.
वेदांत दर्शनाच्या अनेक शाखा आहेत. उपनिषदांचा आणि विशेषतः: ब्रह्मसूत्रांचा अर्थ लावताना जी विविध मते-मतांतरे दिसतात त्यातून या विविध तत्वज्ञान शाखा निर्माण झाल्या आहेत. शंकराचार्यांचे 'ब्रह्मसूत्रभाष्य' हे अद्वैत वेदान्ताचा मुख्य मार्गदर्शक ग्रंथ समाजाला जातो. रामानुजाचार्य यांचे ब्रह्मसूत्रांवरील 'श्रीभाष्य' हे 'विशिष्टअद्वैत वेदांत' या शाखेचा मार्गदर्शक ग्रंथ समाजाला जातो. माध्वाचार्यांचे ब्रह्मसूत्रांवरील 'पूर्णप्रज्ञभाष्य' हा ग्रंथ 'द्वैत वेदांता'चा आधारभूत ग्रंथ आहे. निंबार्काचार्य यांचा 'वेदांतपारिजातभाष्य' हा ग्रंथ 'द्वैताद्वैत वेदांत' शाखेचा प्रमुख ग्रंथ आहे. वल्लभाचार्यांचे ब्रह्मसूत्रांवरील  'अनुभाष्य' हे 'शुद्धाद्वैत वेदांत' या शाखेचा मार्गदर्शक ग्रंथ आहे. 'गोविंदभाष्य' ही ब्रह्मसूत्रांवरील टीका  'अचिंत्यभेदाभेद' ही गौडवैष्णव पंथियांचा प्रमुख ग्रंथ आहे. 'हरेराम पंथीय' हे गौडवैष्णव पंथीयांमध्ये येतात.
अद्वैत वेदांत दर्शन समजण्यास कठीण आहे. म्हणूनच याच्या अभ्यासास सुरुवात करताना सुकर व्हावे म्हणून प्रत्येक शाखेचे काही 'प्रकरण ग्रंथ' (Introductory Texts) आहेत.  दृक्-दृश्य विवेक, वेदांतसार, वेदांत परिभाषा, विवेक चुडामणी, अपरोक्षअनुभूती, उपदेशसहश्री , आत्मबोध हे असे काही प्रकरण ग्रंथ आहेत. या प्रकरण ग्रंथात संपूर्ण वेदांताचा सारांश सांगितलेला असतो अथवा वेदान्ताच्या एखाद्या पैलूचा उहापोह केलेला असतो.
पुढील काही लेखात आपण यातील काही 'प्रकरण ग्रंथांचा' उहापोह करणार आहोत. 

Friday, February 22, 2019

अद्वैत वेदांत आणि विज्ञान


गेले काही आठवडे 'दृक्-दृश्य विवेक' या ग्रंथाचा अभ्यास चालू आहे. पूर्ण होण्यास अजून काही आठवडे जातील. हा ग्रंथ अद्वैत वेदांताचा 'प्रकरण ग्रंथ' (Introductory Text) म्हणून ओळखला जातो. या ग्रंथाचा अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात आली. अद्वैत वेदांत 'हे विश्व ब्रह्म असून दृश्य जग माया आहे' असे मानते.'माया म्हणजे स्थल-काल-कार्यकारणभाव (Space-Time-Causal Relationship)'. विज्ञानाचे हेच क्षेत्र आहे. म्हणजेच असे म्हणता येईल की विज्ञान मायेच्या क्षेत्रातील नियमांचा अभ्यास करते.

अद्वैत वेदांत तीन प्रकारच्या जीवाचा उल्लेख करते.
१>पारिमार्थीक जीव : हा म्हणजेच ब्रह्म
२> व्यावहारिक जीव : हा जीव बाह्य जगातील व्यवहार सांभाळतो. आपण ज्याला सामान्य भाषेत जीव म्हणतो तो हाच जीव. याच जीवाला पुनर्जन्म असतो असे अद्वैत वेदांत मानते. आपल्याला आपल्या ब्रह्मस्वरूपाची जाणीव होताच हा जीव पारिमार्थीक जीवात विलीन होतो.
३> प्रातिभासिक जीव : स्वप्नात आपण उपस्थित असतो, स्वप्ने अनुभवतो. हा स्वप्ने अनुभवणारा जीव म्हणजेच प्रातिभासिक जीव. जाग येताच हा प्रातिभासिक जीव व्यावहारिक जीवात विलीन होतो.

व्यावहारिक जीवासाठी व्यावहारिक जगातील नियम महत्वाचे असतात. म्हणूनच या जीवासाठी विज्ञानाचे महत्व आहे. परंतु मायेच्या क्षेत्रात ब्रह्म येत नसल्याने ते विज्ञानाच्या क्षेत्रात येत नाही. म्हणूनच अद्वैत वेदांतानुसार विज्ञानाच्या नियमांनी अथवा कार्यकारणभावाने ( Logical Thinking) ब्रह्म (अथवा परमेश्वर) सिद्ध करणे हास्यास्पद आहे. ब्रह्म हे केवळ अनुभवाचे क्षेत्र आहे.

Monday, February 4, 2019

भारतीय मुद्रा (रुपया ₹)

भारतीय मुद्रा (रुपया ₹) से जुड़े 31 ग़ज़ब रोचक तथ्य
.
1. भारत में करंसी का इतिहास2500 साल पुराना हैं। इसकी शुरूआत एक राजा द्वारा की गई थी।
.
2. अगर आपके पास आधे से ज्यादा (51 फीसदी) फटा हुआ नोट है तो भी आप बैंक में जाकर उसे बदल सकते हैं।
.
3. बात सन् 1917 की हैं, जब 1₹ रुपया 13$ डाॅलर के बराबर हुआ करता था। फिर 1947 में भारत आजाद हुआ, 1₹ = 1$ कर दिया गया. फिर धीरे-धीरे भारत पर कर्ज बढ़ने लगा तो इंदिरा गांधी ने कर्ज चुकाने के लिए रूपये की कीमत कम करने का फैसला लिया उसके बाद आज तक रूपये की कीमत घटती आ रही हैं।
.
4. अगर अंग्रेजों का बस चलता तो आज भारत की करंसी पाउंड होती. लेकिन रुपए की मजबूती के कारण ऐसा संभव नही हुआ।
.
5. इस समय भारत में 400 करोड़ रूपए के नकली नोट हैं।
.
6. सुरक्षा कारणों की वजह से आपको नोट के सीरियल नंबर में I, J, O, X, Y, Z अक्षर नही मिलेंगे।
.
7. हर भारतीय नोट पर किसी न किसी चीज की फोटो छपी होती हैं जैसे- 20 रुपए के नोट पर अंडमान आइलैंड की तस्वीर है। वहीं, 10 रुपए के नोट पर हाथी, गैंडा और शेर छपा हुआ है, जबकि 100 रुपए के नोट पर पहाड़ और बादल की तस्वीर है। इसके अलावा 500 रुपए के नोट पर आजादी के आंदोलन से जुड़ी 11 मूर्ति की तस्वीर छपी हैं।
.
8. भारतीय नोट पर उसकी कीमत 15 भाषाओंमें लिखी जाती हैं।
.
9. 1₹ में 100 पैसे होगे, ये बात सन् 1957 में लागू की गई थी। पहले इसे 16 आने में बाँटा जाता था।
.
10. RBI, ने जनवरी 1938 में पहली बार 5₹ की पेपर करंसी छापी थी. जिस पर किंग जार्ज-6 का चित्र था। इसी साल 10,000₹ का नोट भी छापा गया था लेकिन 1978 में इसे पूरी तरह बंद कर दिया गया।
.
11. आजादी के बाद पाकिस्तानने तब तक भारतीय मुद्रा का प्रयोग किया जब तक उन्होनें काम चलाने लायक नोट न छाप लिए।
.
12. भारतीय नोट किसी आम कागज के नही, बल्कि काॅटन के बने होते हैं। ये इतने मजबूत होते हैं कि आप नए नोट के दोनो सिरों को पकड़कर उसे फाड़ नही सकते।
.
13. एक समय ऐसा था, जब बांग्लादेश ब्लेड बनाने के लिए भारत से 5 रूपए के सिक्के मंगाया करता था. 5 रूपए के एक सिक्के से 6 ब्लेड बनते थे. 1 ब्लेड की कीमत 2 रूपए होती थी तो ब्लेड बनाने वाले को अच्छा फायदा होता था. इसे देखते हुए भारत सरकार ने सिक्का बनाने वाला मेटल ही बदल दिया।
.
14. आजादी के बाद सिक्के तांबे के बनते थे। उसके बाद 1964 में एल्युमिनियम के और 1988 में स्टेनलेस स्टील के बनने शुरू हुए।
.
15. भारतीय नोट पर महात्मा गांधीकी जो फोटो छपती हैं वह तब खीँची गई थी जब गांधीजी, तत्कालीन बर्मा और भारत में ब्रिटिश सेक्रेटरी के रूप में कार्यरत फ्रेडरिक पेथिक लॉरेंस के साथ कोलकाता स्थित वायसराय हाउस में मुलाकात करने गए थे। यह फोटो 1996 में नोटों पर छपनी शुरू हुई थी। इससे पहले महात्मा गांधी की जगह अशोक स्तंभ छापा जाता था।
.
16. भारत के 500 और 1,000 रूपये के नोट नेपालमें नही चलते।
.
17. 500₹ का पहला नोट 1987 में और 1,000₹ पहला नोट सन् 2000 में बनाया गया था।
.
18. भारत में 75, 100 और 1,000₹ के भी सिक्के छप चुके हैं।
.
19. 1₹ का नोट भारत सरकार द्वारा और 2 से 1,000₹ तक के नोट RBI द्वारा जारी किये जाते हैं.
.
20. एक समय पर भ्रष्टाचार से लड़ने के लिए 0₹ का नोट 5thpillar नाम की गैर सरकारी संस्था द्वारा जारी किए गए थे।
.
21. 10₹ के सिक्के को बनाने में 6.10₹ की लागत आती हैं.
.
22. नोटो पर सीरियल नंबर इसलिए डाला जाता हैं ताकि आरबीआई(RBI) को पता चलता रहे कि इस समय मार्केट में कितनी करंसी हैं।
.
23. रूपया भारत के अलावा इंडोनेशिया, मॉरीशस, नेपाल, पाकिस्तान और श्रीलंका की भी करंसी हैं।
.
24. According to RBI, भारत हर साल 2,000 करोड़ करंसी नोट छापता हैं।
.
25. कम्प्यूटर पर ₹ टाइप करने के लिए ‘Ctrl+Shift+$’ के बटन को एक साथ दबावें.
.
26. ₹ के इस चिन्ह को 2010 में उदय कुमार ने बनाया था। इसके लिए इनको 2.5 लाख रूपयें का इनाम भी मिला था।
.
27. क्या RBI जितना मर्जी चाहे उतनी कीमत के नोट छाप सकती हैं ?
ऐसा नही हैं, कि RBI जितनी मर्जी चाहे उतनी कीमत के नोट छाप सकती हैं, बल्कि वह सिर्फ 10,000₹ तक के नोट छाप सकती हैं। अगर इससे ज्यादा कीमत के नोट छापने हैं तो उसको रिजर्व बैंक ऑफ इंडिया एक्ट, 1934 में बदलाव करना होगा।
.
28. जब हमारे पास मशीन हैं तो हम अनगणित नोट क्यों नही छाप सकते ?
हम कितने नोट छाप सकते हैं इसका निर्धारण मुद्रा स्फीति, जीडीपी ग्रोथ, बैंक नोट्स के रिप्लेसमेंट और रिजर्व बैंक के स्टॉक के आधार पर किया जाता है।
.
29. हर सिक्के पर सन् के नीचे एक खास निशान बना होता हैं आप उस निशान को देखकर पता लगा सकते हैं कि ये सिक्का कहाँ बना हैं.
.
*.मुंबई – हीरा [◆]
*.नोएडा – डाॅट [.]
*.हैदराबाद – सितारा [★]
*.कोलकाता – कोई निशान नहीं.

Monday, January 21, 2019

तीन मार्ग

भारतीय अध्यात्म शास्त्रानुसार मुक्तीपर्यंत पोचण्यासाठी तीन प्रमुख मार्ग सांगितले आहेत.  हे तीन मार्ग तीन  प्रमुख दर्शनांनी सुचविलेले आहेत.

पहिला मार्ग 'भक्तिमार्ग' म्हणून ओळखला जातो. 'पूर्वमीमांसा दर्शन' भक्तिमार्ग पुरस्कृत करते.  देव आहे आणि  तोच देवच  आपल्याला मुक्तीचा मार्ग दाखवेल यावर पूर्ण श्रद्धा असणे हे भक्तिमार्गातील पूर्वअट आहे. देवाची विविध मार्गाने पूजाअर्चा करून देवाला प्रसन्न करून घेणे असा हा मार्ग आहे.

दुसरा मार्ग 'ध्यानमार्ग' हा सांख्य दर्शनाने पुरस्कृत केला आहे. सांख्य दर्शन पुरुष आणि प्रकृती या दोन भिन्न गोष्टी आहेत. हा निसर्ग प्रकृतीने बनला आहे तर पुरुष हा केवळ द्रष्टा  आहे असे हे दर्शन मानते. पृष्ठ आणि प्रकृती यात सरमिसळ झाल्याने (असा समाज झाल्याने) आपल्याला जीवनातील दु:खे वाटूयाला येतात असे हे दर्शन मानते. ध्यानाच्या साहाय्याने निर्विकल्प समाधी अवस्थेतप्रकृतीची जाणीव पूर्णपणे मिटल्याने पुरुषाला आपले खरे स्वरूप कळते आणि तो कैवल्याच्या अवस्थेपर्यंत पोचतो. योगमार्ग हा सांख्य दर्शनावर आधारलेला असल्याने योगमार्गातही समाधी अवस्थेला महत्व आहे.

तिसरा मार्ग 'ज्ञानमार्ग' हा वेदांत दर्शनाचा मार्ग आहे. अद्वैत वेदांतात ब्रह्म हेच केवळ सत्य आहे आणि बाकी सर्व जग हे मायेच्या आवरणामुळे तसे भासते असे अद्वैत वेदांती मानतात. ज्ञान झाल्याने मायेचे हे आवरण निघून जाते आणि आपल्याला आपण ब्रह्म असल्याची जाणीव होते. आपल्याला आपण ब्रह्म असल्याची जाणीव झाल्यावरही मायेने निर्माण केलेले हे जगही आपल्याला दिसते पण ते मायावी असल्याची जाणीवही होते. हीच ती वेदमार्गात सांगितलेली मुक्ती.  

Saturday, January 19, 2019

शोध सुश्रुताचा - भाग ५

ऑगस्टस फ्रेडेरिक रुडॉल्फ हर्न्ले (Hoernle) - आपल्यापैकी किती जणांनी ऐकलय हे नाव? माझी खात्री आहे की बहुतेकांनी नाही.
हर्न्लेचा जन्म सन १८४१ चा. उत्तर भारतातल्या आग्र्यात एका प्रोटेस्टन्ट जर्मन मिशनऱ्याच्या घरात. त्या वेळेच्या प्रथेनुसार वयाच्या ७ व्या वर्षी हर्न्लेला शिक्षणासाठी युरोपमध्ये पाठविण्यात आले. ह्याचे शालेय शिक्षण स्वित्झर्लंडमध्ये झाले. त्याला संस्कृत भाषेत विशेष रस होता म्हणून त्यानंतर पुढे तो लंडनमध्ये त्यावेळेचा संस्कृत भाषेचा पंडित थिओडोर गोल्डस्टूकर (हा पण जर्मन होता!) ह्याच्याकडे संस्कृत शिकायला गेला. संस्कृतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर हर्न्ले १८६५ मध्ये भारतात परत आला. बनारस हिंदू विश्वविद्यालयातील क्वीन्स कॉलेजात संस्कृतचा प्रोफेसर म्हणून ह्याने आपली कारकीर्द सुरु केली. बनारसमध्ये हिंदू धर्मसुधारक आणि धर्मशास्त्रपारंगत दयानंद सरस्वतींचा हर्न्ले चांगला मित्र बनला. दयानंद सरस्वतींवर एक पुस्तकही त्याने लिहिले होते. बनारसला अनेक वर्षे राहून हर्न्ले नंतर १८८५ च्या सुमारास कलकत्ता विश्वविद्यालयात नोकरी करायला गेला.
मागील लेखात आपण पाहिले की हॅमिल्टन बॉवरने ती हस्तलिखित पोथी कलकत्त्यात एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगालला सुपूर्द केली. बॉवरने आणलेले म्हणून ह्या हस्तलिखिताचे नामकरण झाले 'बॉवर मॅन्युस्क्रीप्टस'. हर्न्ले त्यावेळी कलकत्त्याला होता. संस्कृतबरोबर मध्य आशियात बोलली जाणारी खोतानी भाषादेखील हर्न्लेला अवगत होती. त्यामुळे ते हस्तलिखित साहजिकपणे त्याच्याकडे भाषांतरासाठी सोपविण्यात आले. हे वर्ष होते सन १८९१.
हर्न्लेने ह्या बॉवर मॅन्युस्क्रीप्टसचा अभ्यास सुरु केला. सर्वात प्रथम अडचण होती भाषेची. त्या हस्तलिखिताची भाषा संस्कृतसम होती पण संस्कृत नव्हती. लिपीपण नेहमीपेक्षा वेगळी होती. भाषा अगम्य आणि लिपी अगम्य! भाषा वेगळी आणि लिपी वेगळी - असे कसे शक्य आहे? उदाहरण देतो: 'एक्झाम्पल' - इंग्रजीत हा शब्द 'Example' असा लिहिता आला असता पण हा इंग्रजी 'भाषे'तला शब्द मी देवनागरी 'लिपी'त लिहिलाय. हर्न्लेची समस्या नक्की समजण्यासाठी हेच उदाहरण आपण पुढे नेऊया. समजा मी देवनागरीत लिहिले 'बाएश्पीएल' आणि सांगितलं की इंग्रजीत भाषांतर करा - तर तुम्हाला काय समजेल? तुम्हाला मराठीत वाचता येतंय पण अर्थ लागत नाही - मग काय करणार तुम्ही ह्याचे भाषांतर? जोपर्यंत तुम्हाला हे माहित नाहीये की मी देवनागरी लिपीतून जर्मन भाषेत हा शब्द लिहिलाय तोपर्यंत तुम्ही त्याचे भाषांतर करूच शकणार नाही. आणि ह्यासाठी मराठी (लिपी), जर्मन (भाषा) आणि इंग्रजी (भाषांतर भाषा) ह्या तिन्ही भाषा जाणणारा माणूस लागेल. (जाता जाता सांगतो 'बाएश्पीएल' म्हणजे जर्मनमध्ये 'उदाहरण' आणि इंग्रजीत 'Example'). नेमका असाच प्रश्न हर्न्लेला पडला होता आणि त्या वेळेला इंटरनेट अथवा गुगल वगैरे काही नसल्याने हाताशी असेल तेवढेच संदर्भ वापरून त्याला त्या हस्तलिखितांचे भाषांतर करायचे होते. त्यात अजून ती हस्तलिखिते लिहिलेली होती बर्च झाडाच्या पानांवर. बरेचसे भाग पुसट झालेले होते - काही भाग वाचण्याच्या परिस्थितीत नव्हते हापण एक त्रास होताच. हर्न्लेला अनेक जुने संदर्भग्रंथ अभ्यासावे लागले. त्याला तेव्हा कळाले की ती लिपी 'गुप्त ब्रह्मी' लिपी होती. भारतात गुप्त साम्राज्याच्या काळात (ई स २४० ते ई स ५५०) ही लिपी संस्कृत आणि तत्सम भाषा लिहिण्यासाठी वापरली जात असे. त्या हस्तलिखिताची लिपी जरी 'गुप्त ब्रह्मी' लिपी असली तरी भाषा नक्की कोणती होती ते हर्न्लेला नीट समजत नव्हते. पण त्याला ही माहिती मिळाली की बौद्ध धर्माचे बरेचसे साहित्य ब्रह्मी लिपीत आहे आणि ह्यासाठी त्याने बौद्ध धर्माचा अभ्यास सुरु केला.
असं मानतात की ई स पूर्व चौथ्या शतकात पाणिनीने वैदिक भाषेवरून संस्कृत भाषेचे नियम निश्चित केले. संस्कृत ह्या शब्दाचा अर्थच मुळी 'संपूर्णपणे बनलेली' / 'नियमांनी बांधलेली' असा होतो. गौतम बुद्धाचा काल पाणिनीच्याच आसपासचा मानतात. पण त्या काळी संस्कृत भाषा उच्चवर्णीयांची आणि कर्मकांडाची भाषा झाल्याने बुद्धाने त्याचे तत्त्वज्ञान सामान्यांच्या ब्रह्मी आणि पाली भाषांत सांगितले. पण काही वर्षांनंतर संस्कृत हीच सामान्यांची मुख्य प्रचलित भाषा बनली आणि त्यामुळे त्यावरून बौद्ध भिक्षूंनी त्यांची स्वतःची अशी संस्कृतोद्भव संकरीत भाषा बनवली. हे बॉवर मॅन्युस्क्रीप्टस ह्या संस्कृतोद्भव संकरीत भाषेत पण 'गुप्त ब्रह्मी' लिपीत लिहिलेले होते. चार वर्षे - होय - चार वर्षे अथक परिश्रम करून हर्न्लेने शेवटी शोधून काढले की ती लिपी आणि भाषा नेमकी कोणती होती! फक्त कल्पना करा चार वर्षांच्या अथक परिश्रमांनंतर जेव्हा हर्न्लेला ह्याचा शोध लागला असेल तेव्हा त्याला किती अफाट आनंद झाला असेल! त्यानंतर पुढे बारा वर्षे बसून हर्न्लेने ते बॉवर मॅन्युस्क्रीप्टस इंग्रजीत भाषांतरित केले आणि त्याचे थोडे थोडे भाग दर दोन तीन वर्षांनी प्रकाशित केले. आयुष्यातली एकूण अठरा ते वीस वर्षे हर्न्लेने बॉवर मॅन्युस्क्रीप्टसवर खर्च केली.
हर्न्लेने हे पण सिद्ध केले की ती हस्तलिखिते ई स ६०० च्या आसपासच्या काळातली आहेत. त्या वेळेपर्यंत भारतात सापडलेली सर्वात जुनी कागदपत्रे हीच होती. लंडनमध्ये अनेक वर्तमानपत्रांत ह्याच्या बातम्या आल्या. (सध्याचे कार्बन डेटिंग तंत्र वापरून हे सिद्ध झाले आहे की ती हस्तलिखिते ई स ६५० च्या आसपासचीच आहेत. म्हणजे त्याचा अंदाज बरोबरच होता!) त्यामध्ये एकूण ७ खंड होते - २ ज्योतिषविषयक खंड होते, २ बौद्ध रीतीरिवाजविषयक खंड होते, आणि ३ पुरातन वैद्यकीय विषयक. दुर्दैवाने हे वैद्यकीय खंड अपूर्ण होते. जर ते का पूर्ण असते तर संपूर्ण जगातले सर्वात प्राचीन आणि सर्वसंपूर्ण असे ठरले असते. ह्या अपूर्ण खंडांमध्येपण भरपूर वैद्यकीय ज्ञान भरलेले होते - इतके की हर्न्लेच्या ह्या वैद्यकीय खंडांच्या भाषांतरांची दखल चक्क जून १८९५ च्या ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये पण "The Most Ancient Sanskrit Medical Treatise Extant" ह्या मथळयाने घेतली गेली. त्यातल्या भारतीय वैद्यकीय ज्ञानाने त्यांच्या इतकं 'पोटात दुखलं' की ह्या लेखाचा शेवट असा केला आहे - "No doubt many of the articles of the Hindu materia medica are of important therapeutic character and might with advantage be tested in hospitals; but a collection of complex farragos prescribed according to a fanciful and erroneous pathology is practically useless."
असं नक्की काय होतं त्या वैद्यकीय खंडांमध्ये? सुश्रुताचा आणि त्याच्या प्लॅस्टीक सर्जरीच्या पध्दतींचा ह्यात काही संदर्भ मिळाला का? १७९४ मध्ये पुण्यात त्या कुंभाराने वापरलेली पध्दत त्यात सांगितलेली होती का? पाहूया पुढच्या आणि शेवटच्या भागात!
- संकेत कुलकर्णी (लंडन) #Sushrut