Wednesday, November 24, 2021

२६/११ नाही २४/११ म्हणा..

 २६/११ नाही २४/११ म्हणा..

26/11 कारस्थनाचे प्रत्यक्ष execution पाकिस्तानच्या आधी 24/11 रोजी भारतात सुरू झालं होतं! 24/11 ते 26/11 मध्ये काय घडलं होतं याचं गुपित या 6 महत्वाच्या प्रश्नांच्या उत्तरात आहे..
प्रश्न १ : २६/११ हल्ल्यादरम्यान महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आवश्यक असलेल्या भारताच्या सुरक्षा यंत्रणेतील (SECURITY APPARATUS) काही महत्त्वाचे सदस्य- यामध्ये केंद्रीय गृह सचिव, जॉइंट सेक्रेटरी अंतर्गत सुरक्षा, डायरेक्टर अंतर्गत सुरक्षा असे महत्वाच्या जबाबदारी असलेले अधिकारी कुठे होते?
उत्तर : तत्कालीन केंद्रीय गृहसचिव मधुकर गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील गृहमंत्रालयातील ९ सदस्यीय उच्चस्तरीय दल २४ नोव्हेंबर २००८ रोजी इस्लामाबाद येथेे गेले होते आणि २ दिवसांनी परत येणार होते, म्हणजे २६ नोव्हेंबरला दुपारी. पण, त्यांनी इस्लामाबादच्या ६० किमी उत्तरपूर्वकडे असलेल्या मुरी या थंड हवेच्या ठिकाणी अजुन एक रात्र रहायचे पाकिस्तानचे निमंत्रण स्वीकारले आणि तिकडे गेले. म्हणजे २६/११ च्या रात्री जेंव्हा मुंबईत कत्तल सुरू होती, हे सगळे तिकडे शराब आणि शबाब मध्ये रमले होते..
प्रश्न २ : पण, ते स्वतःच्या मनाप्रमाणे असा पूर्वनियोजित कार्यक्रम कसे बदलू शकतात?
उत्तर : ह्या टीम मध्ये शेवटच्या क्षणी, केंद्रीय गृह मंत्री यांच्या आदेशानुसार एक अधिकारी (मंत्रीजींचा खास) शामिल केला गेला होता. त्यांनी पाकिस्तानी निमंत्रण स्वीकारलं आणि इतर अधिकाऱ्यांनीही त्याची 'वट' लक्षात घेता मान्य केलं. फक्त एक अधिकारी - राजेन्द्र सिंग, यांना या सगळ्या प्रकारात काही तरी गडबड वाटली आणि ते पर्सनल कारण सांगून ठरलेल्या कार्यक्रमानुसार परत आले!(बाकी, यांना नंतर इशरत जहाँ केसमध्ये गुंतवून खुप त्रास दिला गेला..)
प्रश्न ३ : मग, रात्री हा हल्ला झाल्यानंतर या अधिकाऱ्यांना कोणी संपर्क करुन सांगितले का नाही?
उत्तर : मूरी त्यावेळी एक 'नो नेटवर्क झोन' होता. तिकडे मोबाइल नेटवर्क तर नव्हताच, लॅंडलाइन कनेक्टिविटी पण ९९% वेळा अल्लाहच्या आणि १% पाकिस्तान सरकार भरोसे होती. टेली-कम्युनिकेशन, केबल-टीवी नेटवर्क बंद करुन यांना बाई-बाटली मध्ये पाकिस्तानने नीट रमवून ठेवलं होतं.
प्रश्न ४ : मग, इकडे होते ते अधिकारी काय करत होते?
उत्तर : अशा इमरजन्सीमध्ये एस.ओ.पी प्रमाणे कामं केली जातात. जर, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वॉर-रुम मध्ये बसायला, नेतृत्व करायला आणि आदेश द्यायलाच कोणी नव्हतंच, तर काय करायचं हे नेमकं सांगणार आणि ठरवणार तरी कोण? नुसता गोंधळ चालू होता तिकडे दिल्लीत त्यावेळी.. एनएसजी कमांडो उशिरा पोचले, त्यांना दिल्ली ते मुंबई वेळेत विमान उपलब्ध नव्हते, मुंबईत उतरल्यावर त्यांना घेऊन जाण्यासाठी BEST च्या विशेष बस साठी तब्बल ९० मिनिट वाट पहावी लागली आणि तो पर्यंत एकही (ताज हॉटेल चे फ्लोर प्लान सकट) लोकेशनचे मॅप त्या NSG कमांडोजसाठी तयार ठेवण्यात आले नव्हते. मीडिया ला कोणी Do's & Dont's सांगायला नव्हतं ज्यामुळे रावळपिंडीत ISI वाले एनएसजीच्या हालचाली लाईव्ह बघत होते! ब्यूरोक्रेटिक लिडरशीप तिकडे बाई-बाटली च्या नशेत तरर्र होती..
प्रश्न ५ : पाकिस्तानने असं का केलं?
उत्तर : युद्धात 'स्ट्रेटेजिक डिसेप्शन' हे एक मोठे हत्यार असते. पाकिस्तान ला याबद्दल तिळमात्र शंका नव्हती की ते भारताविरुद्ध युद्ध करत आहेत. भारतात मात्र अगदी आज पण २६/११ ला 'आतंकवादी हमला' म्हणत आहेत आपली लोकं, युद्ध नाही. भारतात नेमकं हेच होणार याची पाकिस्तानला खत्री होती. २६/११ सारखे कांड करायचे धाडस पाकिस्तान ला भारतात नसलेल्या Clarity of thoughts मुळे सहज-शक्य झालं.
प्रश्न ६: मग, हे सगळे २६/११ नंतर लोकांना का सांगितलं नाही?
उत्तर : "बडे-बडे शहरों में छोटी-छोटी बातें होती रहती है!"- आर आर पाटील उर्फ आबा, गृह मंत्री, महाराष्ट्र शाशन बोलले. मुख्यमंत्री विलासराव देशमुख रितेश आणि रामगोपाल वर्माला घेऊन ताज हॉटेलला गेले. केरळ चा मुख्यमंत्री (अ)चुतियानंदन बोलला की संदीप उन्नीकृष्णन च्या घरी कुत्रा पण जाणार नाही. शिवराज पाटील चाकुरकर ७२ तासात ८ वेळा कपडे/कोट बदलत राहिले.. कसाब ला पकडणाऱ्या ओंबाळे यांच्या शौर्याची थट्टा करत ही लोकं 'भगवा आतंकवाद' बोंबलत राहिले, आणि राज्यात आणि केंद्रात दोन्हीकडे सत्ताधारी असलेल्या काँग्रेसने पाकिस्तानला एक प्रकारे क्लीन-चिटच दिली होती! करकरे कामठे साळसकर यांच्या या हल्ल्यात झालेल्या मृत्यूवरून जाणूनबुजून निर्माण केलेला वाद आणि ज्यांनी बोलायला हवं होतं त्या मनमोहन सिंग यांचे लज्जास्पद मौन.. असे अनेक फॅक्टर्स होते. पब्लिकला नको त्या विषयांत व चर्चांत बिजी ठेवण्यात राजकारणी आणि मीडिया ला यश मिळालं! मग, 24/11 ते 26/11 मधील या कारस्थानावर कोण बोलणार?
मग आता?
४ दिवस देशाच्या इज्जतीची लखतरं गेटवे ऑफ इंडिया वर टांगणाऱ्या २६/११ च्या 'युद्धात', हलकट सरकार व गद्दार अधिकाऱ्यांमुळे जीव गमावलेल्या भारतसहित १७ देशांच्या १८४ निष्पाप लोकांना, महाराष्ट्र पोलिसांच्या १४ जवान/अधिकाऱ्यांना आणि २ एनएसजी कमांडोंना भावपूर्ण श्रद्धांजली वाहायची आणि गप्प बसायचं!
- वेद कुमार

No comments:

Post a Comment