Tuesday, August 20, 2024

काशी-मथूरा

 १७५७ मध्ये होळीच्या वेळी (दोन दिवस), मथुरा आणि वृंदावन यांनी अहमद शाह अब्दाली आणि त्याच्या सैन्याच्या हातून हिंदूंचा संहार पाहिला. होळी साजरी करण्यासाठी तेथे जमलेले हजारो स्थानिक आणि यात्रेकरू यात बळी पडले. त्यांनी लहान मुले आणि महिलांनाही सोडले नाही. तो दिवस २८ फेब्रुवारी १७५७ हा होता. 


जाट राजपुत्र जवाहर सिंग याने ५००० सैनिकांसह अब्दालीच्या सैन्याला मथुरा गावाबाहेर प्रतिकार करण्याची तयारी दर्शवली होती, परंतु ती व्यर्थ ठरली. ही लढाई ९ तास चालली. जवाहरसिंगच्या ३००० सैनिकांनी वीरगती गाठली.


त्यानंतर अब्दालीच्या फौजांनी गोकुळकडे कूच केले. तेथील नागा साधूंनी मंदिरे आणि लोकांचे रक्षण केले. अब्दालीच्या सैन्याविरुद्ध झालेल्या भीषण युद्धात नागा साधू विजयी झाले. यात २००० हून अधिक नागा साधूंना वीरगती प्राप्त झाली.


या दोन दिवसांत धर्म आणि मातृभूमीसाठी सद्गती मिळवलेल्या आणि नरसंहाराला बळी पडलेल्या आपल्या सर्व योद्धा पूर्वजांना ही होळी समर्पित करुयात.


- आपला अमर




No comments:

Post a Comment