Friday, November 21, 2014

स्वातंत्र्याची महत्ता

लोकांना आजही भाकडकथा सांगत,
कोणाचे तरी काल्पनिक भय दाखवत,
ठसवत,
प्रसंगी आक्रमक होत
वैचारिक गुलाम निर्माण करणा-या
संघटनांचे
आणि त्यांचे गुलाम असणा-या
कथित विचारवंतांचे
आज प्राबल्य वाढत आहे.

मित्रहो, काल्पनिक भयाने भयभित होऊ नका...
भयदायक असे संपुर्ण विश्वात काहीएक नाही
स्वत:ची स्वतंत्र बुद्धी वापरा...

संघटना बनवणे हाच मुळात गुलामीकडे जायचा
आणि इतरांनाही
वैचारिक गुलामीच्या गटारात
नेण्याचा मार्ग आहे
त्यापासून नेहमीच सावध रहा!

आदिमानवाने झुंडी बनवल्या
काल्पनिक भयापोटी
टोळ्या बनवल्या
तो टोळीवाद आजही जीवंत किती!

भेकड लोकच झुंडी बनवतात...टोळ्या बनवतात...
संघटना बनवतात...
भेकडांना अधिकच भेकड बनवतात
भेकडाची हिंसकता अधिकच भयावह असते
आणि यच्चयावत विश्वात
अशा भेकडांच्या यादीत जावू नका
स्वतंत्र व्हा

स्वत:चे विचार विकसनशील ठेवा
कोणाही गतकाळातील
वर्तमानातील
महापुरुषांना अंतिम मानू नका
विश्वात मुळात अंतिम असे
काहीएक नाही

पुढे चाला...
अग्रगामी व्हा...जसा काळ अग्रगामी असतो..
तरच आपण स्वतंत्र असतो.
तीच ख-या स्वातंत्र्याची महत्ता आहे!

-------------------------------------------------------------------------------------------
कवी Sanjay Sonawani

No comments:

Post a Comment