Friday, November 21, 2014

डॉ. राम मनोहर लोहिया यांची विकासनीती भाग -१

डॉ. राम मनोहर लोहिया
डॉ. राम मनोहर लोहिया हे नामवंत अर्थतज्ञ होते. स्वातंत्रासाठी झालेल्या 'Quit India' १९४२ क्रांतीच्या पाच मोठ्या नेत्यांपैकी एक होते. गोवा मुक्ती आंदोलन त्यांच्या नेतृत्वाखाली लढले गेले. तेव्हाच्या समाजवादी पक्षाचे ते अध्यक्ष होते. पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत (१९५२) समाजवादी पक्ष निवडून येईल अशी अपेक्षा होती आणि निवडून आल्यास नवस्वतंत्र देशाला विकासाची दिशा देण्याचे, नवी विकासनीती तयार करणे आणि राबविण्याची जबाबदारी नवस्वतंत्र देशाच्या पहिल्या सरकारवर पडणार होती.
ही नवी विकासनीती तयार करण्यासाठी समाजवादी पक्षाने एक समिती नेमली होती आणि या समितीचे अध्यक्ष डॉ. राम मनोहर लोहिया होते. या समितीने जो आराखडा तयार केला होता त्यावर गांधीवादी अर्थशास्त्राचा प्रभाव होता. किंबहुना गांधीवादी अर्थशास्त्राला आधुनिक युगात वापरण्यायोग्य स्वरूप या आराखड्यात दिले गेले होते.
हा विकास आराखडा काय होता, तो का राबविला गेला नाही, त्यामुळे आपल्या विकासावर काय परिणाम झाला, तो कोणत्या देशांनी राबविला आणि त्यांना त्याचे काय फायदे/तोटे झाले याचा विचार आपण या लेखमालेत करणार आहोत.

कोणालाही (राष्ट्र, कंपन्या, माणसांचे समूह किंवा वैयक्तिक) विकास आराखडा ठरविताना चार प्राथमिक गोष्टींचा विचार करावा लागतो.
  1. बलस्थाने (Strengths)
  2. मर्यादा (Weaknesses)
  3. संधी (Opportunities)
  4. धोके (Threats)
यापैकी बलस्थाने आणि मर्यादा या अंतर्गत (Internal) असतात तर संधी आणि धोके हे बाह्य परिस्थितीमुळे (Environment) निर्माण होतात. अशा प्रकारे मूल्यमापन करण्याच्या पद्धतीला व्यवस्थापन शास्त्रात SWOT Analysis म्हणतात.
भारताचे SWOT Analysis आपण पुढील भागात करू.
(क्रमश:)


No comments:

Post a Comment