![]() |
डॉ. राम मनोहर लोहिया |
ही नवी विकासनीती तयार करण्यासाठी समाजवादी पक्षाने एक समिती नेमली होती आणि या समितीचे अध्यक्ष डॉ. राम मनोहर लोहिया होते. या समितीने जो आराखडा तयार केला होता त्यावर गांधीवादी अर्थशास्त्राचा प्रभाव होता. किंबहुना गांधीवादी अर्थशास्त्राला आधुनिक युगात वापरण्यायोग्य स्वरूप या आराखड्यात दिले गेले होते.
हा विकास आराखडा काय होता, तो का राबविला गेला नाही, त्यामुळे आपल्या विकासावर काय परिणाम झाला, तो कोणत्या देशांनी राबविला आणि त्यांना त्याचे काय फायदे/तोटे झाले याचा विचार आपण या लेखमालेत करणार आहोत.
कोणालाही (राष्ट्र, कंपन्या, माणसांचे समूह किंवा वैयक्तिक) विकास आराखडा ठरविताना चार प्राथमिक गोष्टींचा विचार करावा लागतो.
- बलस्थाने (Strengths)
- मर्यादा (Weaknesses)
- संधी (Opportunities)
- धोके (Threats)
भारताचे SWOT Analysis आपण पुढील भागात करू.
(क्रमश:)
No comments:
Post a Comment