Saturday, November 22, 2014

डॉ. राम मनोहर लोहिया यांची विकासनीती भाग -२ :SWOT Analysis

या लेखमालेच्या मागील भागात आपण SWOT Analysis या व्यवस्थापन विचार पद्धतीला स्पर्श केला होता.

आपल्या देशाच्या विकासनीतीवर भाष्य करताना देशाचे SWOT Analysis करणे आवश्यक आहे. डॉ. लोहियांच्या काळी (स्वातंत्र्य मिळाले तेव्हा) असलेल्या आपल्या बलस्थाने आणि मर्यादांमध्ये आता थोडा बदल झाला आहे. संधी आणि धोके यामध्ये मात्र मोठा बदल झालेला जाणवतो. या लेखाची मर्यादा लक्षात घेऊन आपण स्वातंत्र्याच्या वेळच्या परिस्थितीचाच प्रामुख्याने विचार करणार आहोत.


बलस्थाने  (Strengths): देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळचा विचार करता पुढील बलस्थाने दिसून येतात.

सांस्कृतिक आणि भौगोलिक विविधता
शेती, औषधोपचार, धातुशास्त्र, वास्तुशास्त्र इ. मधील पारंपारिक ज्ञान
पशु आणि मानवी श्रमांत काम करू शकणारी यंत्रे आणि अवजारे
प्राचीन सामाजिक आणि आर्थिक घट्ट वीण (जी ब्रिटिशांनी काही प्रमाणात उसविली होती).
वेगळ्या विचारांचा (धर्म, पंथ इत्यादी) आदर अरण्याची परंपरा, धार्मिक सहिष्णुता (जी ब्रिटिशांनी काही प्रमाणात  मोडली होती).
प्राचीन आर्थिक भरभराटीचा, व्यापाराचा वारसा (दुसऱ्या महायुद्धापर्यंत भारतीय GDP चा वाटा जगाच्या ३०% होता. स्वातंत्र्याच्या वेळी 1USD = 1INR होते)
धार्मिक आणि राजकीय सत्ता वेगळ्या (युरोपात या सत्ता एकमेकांत विलीन झाल्या होत्या)
पर्यावरण संरक्षणाला धार्मिक विचारात महत्वाचे स्थान
पूर्वेकडील देशांचे सांस्कृतिक नेतृत्व
मध्यपूर्वेतील देशांचे आर्थिक नेतृत्व (१९५६ पर्यंत मध्यपूर्वेतील देश भारतीय रुपया हे चलन वापरीत होते).
तिबेटसारख्या शांततावादी मित्राचा उत्तरेकडे शेजार
पाण्याची भरपूर उपलब्धता
मोटारी, विमाने, शस्त्रास्त्रे यासारख्या गोष्टी भारतात बनत होत्या.
मर्यादा (Weaknesses): देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळचा विचार करता पुढील मर्यादा दिसून येतात.

पुरेसे भांडवल उपलब्ध नाही
कच्चा माल पुरविणारे सुपीक त्रिभुज प्रदेश पाकिस्तानात गेले तर त्यावर प्रक्रिया करणारे कारखाने भारतात राहिले. यामुळे कच्च्या मालाची अनुपलब्धता
जाती धर्मात विभागाला गेलेला समाज., जन्माधिष्टीत उच्चनीचता, अस्पृश्यता
विजेची, पोलादाची अनुपलब्धता
मोठी लोकसंख्या, शेतीची कमी उत्पादकता, मोसमी पावसाचा लहरीपणा
सततच्या आक्रमणांमुळे / अपप्रचारामुळे नागरिकांमधील पराभूत मानसिकता
प्रत्येक गोष्टीसाठी सरकारवर / राजावर अवलंबून राहण्याची मानसिकता
संस्थाने विलीन करण्यास होणारा विरोध
संधी  (Opportunities): देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळचा विचार करता त्यावेळी पुढील संधी उपलब्ध होत्या असे दिसते.

नव-स्वतंत्र देश भारताकडे नेतृत्वाच्या अपेक्षेने पाहत होते.
मध्य-पूर्वेकडील देशांत तेलाचे साठे मिळत होते, त्या देशांचे आर्थिक नेतृत्व आपल्याकडे होते.
देश विकासाच्या उंबरठ्यावर होता. विकासाची दिशा ठरविण्यास वाव होता.
देशाच्या नेतृत्वाला जनता देवाप्रमाणे मानीत होती. जनतेचे मन वळविणे अधिक सोपे होते.
येथे बनणारी शस्त्रास्त्रे घेण्यासाठी नवस्वतंत्र देश उत्सुक होते.
धोके (Threats) : देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळचा विचार करता त्यावेळी देशाच्या विकासाला पुढील धोके होते असे दिसते.

देशाचे तुकडे पाडण्यासाठी प्रयत्न करणारी पाश्चात्य राष्ट्रे.
पाकिस्तानकडून आक्रमणाचा धोका
आपली औद्योगिक प्रगती रोखण्याचा प्रयत्न करणारी पाश्चत्य राष्ट्रे
देशाच्या उत्तरेला असलेला साम्राज्यवादी चीन (१९५० नंतर)
या बलस्थाने/मर्यादा/संधी/धोके यांचा विचार करूनच देशाच्या विकासाची रूपरेखा (Road map) बनविणे आवश्यक होते. आपली बलस्थाने आणि मर्यादा पाश्चात्य राष्ट्रांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या होत्या. म्हणूनच आपली विकासनीती पूर्णपणे वेगळी (Unique) असणे आवश्यक होते. डॉ. लोहिया हे स्वातंत्र्य लढ्याचे सेनानी असलेले जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ होते. त्यांना आपल्या देशाच्या बलस्थानांची आणि मर्यादांची पूर्णपणे जाणीव होती. म्हणूनच त्यांच्या अध्यक्षतेखाली तेव्हाच्या समाजवादी पक्षाच्या समितीने बनविलेली विकासनीती देशाच्या गरजांचे भान असलेली होती.

या विकसनीतीचा उहापोह आपण पुढील लेखात करुया.

No comments:

Post a Comment