Saturday, March 25, 2017

भारतीय अर्थव्यवस्था लेख १

आज शहरे बकाल आणि खेडी भकास झाली आहेत. आपले जीवनमूल्य वाढवायचे असेल तर शहरे खेडी यात समतोल साधला गेला पाहिजे. आपल्या प्राचीन व्यवस्थेने यात समतोल साधला होता. त्याकडे पाहून आपल्याला काही शिकता येईल.
'भारत हा कृषिप्रधान अर्थव्यवस्थेचा देश होता' ही आपली पाश्चात्य देशांनी करून दिलेली भामक समजूत आहे. कृषिप्रधान अर्थव्यवस्था असलेले देश कच्च्या मालाची निर्यात करतात आणि पक्का माल आयात करतात. भारतात अशी व्यवस्था (इंग्रज राजवटीचा काल सोडता) कधीच नव्हती. भारत हा पक्क्या मालाची निर्यात करणारा देश म्हणूनच ओळखला जात होता. येथील मलमलीला जगात प्रचंड मागणी होती. येथील रेशमाचे कापड पश्चिमेकडील देश सोन्याच्या बदल्यात घेत असत. यामुळे युरोपातील सोने संपत आले असल्याचे उल्लेख आहेत. येथे कच्च्या रेशमाची आयात चीनमधून केली जात असे आणि पक्के रेशमाचे कापड निर्यात होत असे. म्हणजेच हा कृषी अर्थव्यवस्था असलेला देश नव्हे. परंतु आपली इंग्रजांनी तशी समजूत करून दिल्याने आपल्या अर्थव्यवस्थेला आपण योग्य दिशा देऊ शकलो नाही. याचा परिणाम बकाल शहरे आणि भकास खेडी यात झाला. मग शेतकरी गरीब होत गेला, शेतकरी आत्महत्या करू लागला. कर्जमुक्ती/कर्जमाफी सारख्या तात्पुरत्या मलमपट्टीने (मूळ रोगावर इलाज न केल्याने) ही परिस्थिती अधिकच चिघळली.
आपल्या पूर्वजांनी ग्रामीण आणि नागरी अर्थव्यवस्थेमध्ये समन्वय कसा साधला होता, आताच्या परिस्थितीत त्यातून काही शिकण्यासारखे आहे काय हे पुढील पोस्टमधून पाहू.

No comments:

Post a Comment