Monday, March 27, 2017

शालिवाहन शक

Image result for गुढीपाडवाशालिवाहन शकाचा प्रारंभ गौतमीपुत्र शतकर्णी (शालिवाहन ) याने इसवी सन ७८ मध्ये केला. शकांवर मिळविलेल्या विजयाच्या स्मृतीप्रीत्यर्थ हे संवत्सर चालू केले.

शक हे भारताच्या वायव्येला असणाऱ्या प्रदेशातील रहिवासी होते.  त्यांच्या बाजूलाच कुशाण हे टोळीपद्धतीने  राहणारे समूह होते.  कुशाणांच्या बाजूला असणाऱ्या हुण (हान?) वंशाच्या लोकांनी कुशाणांवर आक्रमण करून त्यांना हुसकावून लावले. कुशाणांनी शक वंशियांवर हल्ला करून त्यांचा प्रदेश बळकाविला. यामुळे विस्थापित झालेल्या शकांनी भारतावर हल्ले चालू केले. यावेळी भारतात गणराज्ये आणि छोटी राज्ये अस्तित्वात होती. त्यांचा शकांपुढे पाडाव लागला नाही आणि सिंध, गुजरात आणि राजस्थानात शंकांची राजवट सुरु झाली. शकांनी दक्षिण भारतावर हल्ल्याची तयारी सुरु केली.
राजा विक्रमादात्याने शकांचा पाडाव केला. आणि स्वत:चे शक चालू केले.
तरीही शाकांचा उपद्रव चालूच होता.  मग गौतमीपुत्र सातकर्णी याने शाकांचा पूर्ण पराभव केला आणि शके संवत्सर चालू केले.
त्यानंतर हुणांच्या त्रासाला कंटाळून कुशाणांनी भारतावर आक्रमण केले आणि कुशाण राजा कनिष्क भारताचा सम्राट बनला. कुशाण भारतीय संस्कृतीत सामावले गेले.
महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश येथे तसेच कंबोडिया येथे शालिवाहन संवत्सर पाळले जाते. १६३३ पर्यंत जावामध्येही शालिवाहन संवत्सर पाळले जात होते.

No comments:

Post a Comment