Monday, March 27, 2017

भारतीय अर्थव्यवस्था लेख ५

भारतीय प्राचीन अर्थव्यवस्था कृषीअर्थव्यवस्था नव्हती तर औद्योगिक भक्कम अर्थव्यवस्था होती हे आपण मागील लेखांत पहिले. भारताचा GDP जगाच्या तीस टक्के होता हे ही आपण पहिले. ब्रिटीश राजवटीने आपल्या अर्थव्यवस्थेचा पाया खिळखिळा केला. आपली अर्थव्यवस्था कृषिप्रधान होती असा समाजही त्यांनी करून दिला. त्यामुळे तसेच पाश्चात्य अर्थव्यवस्थेचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे आपण प्रगती करू शकलो नाही.
अर्थव्यवस्थेचा विकास करण्यासाठी पुढील बाबी आवश्यक असतात
1> कच्च्यामालापासून पक्क्यामालापर्यंत  वस्तू, माहिती आणि पैसे सर्व पातळ्यांवर योग्य प्रकारे पोचविण्याची व्यवस्था (Supply Chain Management)
2> उर्जेचा योग्यआकारे वापर
3> सुरक्षितता

प्राचीन भारताची Supply Chain Management किती भक्कम होती हे आपण आधीच्या भागात पहिले.

येथे उर्जेच्या वापराबाबतही अत्यंत उत्कृष्ठ व्यवस्था होती. बैल हा येथील उर्जेचा मुख्य स्त्रोत होता. येथील उष्ण हवेत उन्हातही चांगले काम करू शकतील अशी बैलांची वाणे विकसित केली गेली होती. चांगले काम करवून घेण्यासाठी अंडे चेपालेला बैल तर प्रजोत्पादनासाठी मोकळा सोडलेला वळू अशीही विभागणी होती.
शेतकऱ्याकडे एकाच बैलजोडी असेल तरीही तो त्यापासून वाहतूक आणि शेतीची सर्व कामे करून घेऊ शकत होता. आजूबाजूच्या रानातून बैलांना चारा मिळत होता, त्यांची विष्ठा शेतीला खात म्हणून उपयोगी होती. कमीत कमी प्रदूषण करून उर्जा मिळविणारी ही व्यवस्था होती.बैलांबरोबर स्वाभाविकच गायीही शेतकऱ्यांकडे असत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पौष्टिक आहाराचा प्रश्नही सुटत असे.

आपल्या प्राचीन राजांना सुरक्षिततेच्या प्रश्नाची जाणीव होती. भारताला नैसर्गिक संरक्षण लाभल्याने खैबर खिंडीव्यतिरिक्त येथे येण्यास वाव नव्हता. परंतु गेल्या हजार-दीड हजार वर्षात संरक्षणाकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले. अहिंसेच्या अतिरेकी कल्पना समाजात रुजल्याने हे झाले असावे. मिळविलेल्या संपत्तीचे रक्षण करता येत नसेल नसेल तर ही संपत्ती चोरांच्याच हातात जाते हा धडा आपण गेल्या हजार-पंधराशे वर्षात शिकलो.

या आपल्या प्राचीन समृद्ध अर्थव्यवस्थेतून आपण सध्याच्या काळासाठी काही धडे घेणार आहोत का?
पाश्चात्यांचे अंधानुकरण करून आपल्याकडे समृद्धी येणार नाही तर आपल्या समाजात रुजलेल्या कल्पनांचा उपयोग केला आणि समाजाला योग्य दिशेने नेले तरच येथे समृद्धी येऊ शकेल आणि नांदू शकेल.

याबद्दल आपल्याला काय वाटते? मी प्रतिक्रिया जाणून घेण्यास उत्सुक आहे.

<<लेखमाला समाप्त >>

No comments:

Post a Comment