भारतीय अध्यात्मशास्त्र हे पाश्चात्य संकल्पनांनुसार केवळ तात्विक Philosophy नाही तर ऐहिक जीवनाचा पाया आहे.
भारतीय अध्यात्मात पंचममहाभुतांची कल्पना मांडली आहे. ही कल्पना भारतीय अध्यात्माचा पाया आहे असे म्हणता येईल. ही कल्पना न्याय-वैशेषिक तत्वज्ञानातून आलेली आहे. न्याय-वैशेषिक तत्वज्ञान अत्यंत प्राचीन मानले जाते. प्रपंच या शब्दाचा अर्थच पंचमहाभूतांपासून बनलेले.
ही पंचमहाभूतांची कल्पना माणसाच्या पाच ज्ञानेंद्रियांभोवती गुंफलेली आहे.
आकाशतत्व हे पहिले पंचमहाभूत.आकाशाचा शब्दगुण आहे.
वायूतत्व हे दुसरे पंचमहाभूत. वायूमध्ये शब्दगुण आहेच, पण स्पर्शगुणही आहे.
अग्नीतत्व हे तिसरे पंचमहाभूत. यात शब्द आणि स्पर्शगुण आहेतच. पण यात रूपगुणही आहे.
जलतत्व हे चौथे पंचमहाभूत. त्यात शब्दगुण , स्पर्शगुण आणि रूपगुण आहेतच. पण यात रसगुणही आहे.
पृथ्वीतत्व हे पाचवे पंचमहाभूत. यात शब्दगुण , स्पर्शगुण, रूपगुण आणि रसगुणही आहेतच, पण यात गंधगुण ही आहे.
हा जो क्रम मांडला आहे तो सूक्ष्म (तरल) अनुभूतीपासून आपण स्थूल अनुभूतीकडे आहे. पृथ्वीतत्त्व सर्वात स्थूल अनुभूती देणारे आहे तर आकाशतत्व सर्वात तरल अनुभूती देणारे आहे.
गांधत्व, द्रव्यत्व, उष्णत्व, चालावं आणि अप्रतिघात (प्रतिघात = अडथळा) हे अनुक्रमे पृथी, जल, अग्नी, वायू आणि आकाशतत्वाचे गुण आहेत.
पंचमभूतांचा त्रिदोषांशीही संबंध आहे. आकाश हे प्रामुख्याने सत्वगुण दर्शक आहे, वायू रजोगुणदर्शक आहे, सत्व आणि रजोगुण हे अग्नितत्वात असतात. सत्व आणि तमोगुण जलतत्वात असतात. पृथ्वीतत्त्व प्रामुख्याने तमोगुणांनी भरलेले आहे.
वैशेषिक दर्शनानुसार परमेश्वराला जेव्हा सृष्टी निर्माण करण्याची इच्छा झाली तेव्हा ही पंचमहाभूते पंचमहाभूते एकमेकांशी संलग्न झाली आणि सृष्टीची निर्मिती झाली.
सांख्य तत्वज्ञानाचा आधार घेऊन कुंडलिनी शास्त्र उगम पावले. यात सप्त चक्रे सांगितली आहेत. ही चक्रे या पंचमहाभूतांच्या क्रमानेच येतात. मूलाधार चक्र हे पहिले चक्र. ते पृथ्वीतत्वाशी संबंधित आहे आणि ते आपल्या पाठीच्या कण्याच्या सर्वात खाली असते. पृथ्वीतत्त्व स्थूलअनुभवांशी जोडलेले असल्याने साधना या चक्रापासून सुरु होते. त्यानंतर येणारे स्वाधिष्ठान चक्र हे जलतत्वाशी संबंधित आहे. त्यानंतरचे मणिपूर चक्र हे अग्नितत्वाशी, अनाहत चक्र वायुतत्वाशी तर विशुद्ध चक्र आकाशतत्वाशी संबंधित आहे. या नंतरची दोन चक्रे 'आज्ञाचक्र आणि 'सहस्त्रार' अधिक सूक्ष्माकडे घेऊन जातात. कुंडलिनी साधना याच क्रमाने या चक्रांना जागृत करते. या साधनेत आपण स्थूलाकडून सूक्ष्माकडे प्रवास करतो.
योगशास्त्र आणि आयुर्वेदशास्त्र हे सांख्य तत्वज्ञानाचा आधार घेऊनच विकसित झाले आहे. या दोन्ही शास्त्रातही पंचममहाभूतांना महत्व आहे.
पंचमहाभूते आयुर्वेदातील त्रिदोषांशी संबंधीत आहेत. कफदोष हा पृथ्वी आणि जल तत्व यांच्या संयोगाने बनतो. पित्तदोष हा अग्नीतत्वाचे रूप आहे तर वातदोष हा वायू आणि आकाश या तत्वांनी बनतो.
अशाप्रकारे भारतीय अध्यात्मशास्त्र हे दैनंदिन जीवनाशी संबंधित आहे.
भारतीय अध्यात्मात पंचममहाभुतांची कल्पना मांडली आहे. ही कल्पना भारतीय अध्यात्माचा पाया आहे असे म्हणता येईल. ही कल्पना न्याय-वैशेषिक तत्वज्ञानातून आलेली आहे. न्याय-वैशेषिक तत्वज्ञान अत्यंत प्राचीन मानले जाते. प्रपंच या शब्दाचा अर्थच पंचमहाभूतांपासून बनलेले.
ही पंचमहाभूतांची कल्पना माणसाच्या पाच ज्ञानेंद्रियांभोवती गुंफलेली आहे.
आकाशतत्व हे पहिले पंचमहाभूत.आकाशाचा शब्दगुण आहे.
वायूतत्व हे दुसरे पंचमहाभूत. वायूमध्ये शब्दगुण आहेच, पण स्पर्शगुणही आहे.
अग्नीतत्व हे तिसरे पंचमहाभूत. यात शब्द आणि स्पर्शगुण आहेतच. पण यात रूपगुणही आहे.
जलतत्व हे चौथे पंचमहाभूत. त्यात शब्दगुण , स्पर्शगुण आणि रूपगुण आहेतच. पण यात रसगुणही आहे.
पृथ्वीतत्व हे पाचवे पंचमहाभूत. यात शब्दगुण , स्पर्शगुण, रूपगुण आणि रसगुणही आहेतच, पण यात गंधगुण ही आहे.
हा जो क्रम मांडला आहे तो सूक्ष्म (तरल) अनुभूतीपासून आपण स्थूल अनुभूतीकडे आहे. पृथ्वीतत्त्व सर्वात स्थूल अनुभूती देणारे आहे तर आकाशतत्व सर्वात तरल अनुभूती देणारे आहे.
गांधत्व, द्रव्यत्व, उष्णत्व, चालावं आणि अप्रतिघात (प्रतिघात = अडथळा) हे अनुक्रमे पृथी, जल, अग्नी, वायू आणि आकाशतत्वाचे गुण आहेत.
पंचमभूतांचा त्रिदोषांशीही संबंध आहे. आकाश हे प्रामुख्याने सत्वगुण दर्शक आहे, वायू रजोगुणदर्शक आहे, सत्व आणि रजोगुण हे अग्नितत्वात असतात. सत्व आणि तमोगुण जलतत्वात असतात. पृथ्वीतत्त्व प्रामुख्याने तमोगुणांनी भरलेले आहे.
वैशेषिक दर्शनानुसार परमेश्वराला जेव्हा सृष्टी निर्माण करण्याची इच्छा झाली तेव्हा ही पंचमहाभूते पंचमहाभूते एकमेकांशी संलग्न झाली आणि सृष्टीची निर्मिती झाली.
सांख्य तत्वज्ञानाचा आधार घेऊन कुंडलिनी शास्त्र उगम पावले. यात सप्त चक्रे सांगितली आहेत. ही चक्रे या पंचमहाभूतांच्या क्रमानेच येतात. मूलाधार चक्र हे पहिले चक्र. ते पृथ्वीतत्वाशी संबंधित आहे आणि ते आपल्या पाठीच्या कण्याच्या सर्वात खाली असते. पृथ्वीतत्त्व स्थूलअनुभवांशी जोडलेले असल्याने साधना या चक्रापासून सुरु होते. त्यानंतर येणारे स्वाधिष्ठान चक्र हे जलतत्वाशी संबंधित आहे. त्यानंतरचे मणिपूर चक्र हे अग्नितत्वाशी, अनाहत चक्र वायुतत्वाशी तर विशुद्ध चक्र आकाशतत्वाशी संबंधित आहे. या नंतरची दोन चक्रे 'आज्ञाचक्र आणि 'सहस्त्रार' अधिक सूक्ष्माकडे घेऊन जातात. कुंडलिनी साधना याच क्रमाने या चक्रांना जागृत करते. या साधनेत आपण स्थूलाकडून सूक्ष्माकडे प्रवास करतो.
योगशास्त्र आणि आयुर्वेदशास्त्र हे सांख्य तत्वज्ञानाचा आधार घेऊनच विकसित झाले आहे. या दोन्ही शास्त्रातही पंचममहाभूतांना महत्व आहे.
पंचमहाभूते आयुर्वेदातील त्रिदोषांशी संबंधीत आहेत. कफदोष हा पृथ्वी आणि जल तत्व यांच्या संयोगाने बनतो. पित्तदोष हा अग्नीतत्वाचे रूप आहे तर वातदोष हा वायू आणि आकाश या तत्वांनी बनतो.
अशाप्रकारे भारतीय अध्यात्मशास्त्र हे दैनंदिन जीवनाशी संबंधित आहे.
हे झाले थोडे विषयांतर. पुन्हा बॉवर मॅन्युस्क्रीप्टसकडे वळूया. मागच्या लेखात पाहिल्याप्रमाणे हर्न्लेने शोधून काढले की त्यांमध्ये एकूण ७ खंड होते: २ ज्योतिषविषयक, २ बौद्ध रीतीरिवाजविषयक, आणि ३ पुरातन वैद्यकीय विषयक. ह्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे बॉवर मॅन्युस्क्रीप्टसच्या सुरुवातीला १० अश्या 'पवित्र' व्यक्तींचा उल्लेख आलेला आहे की ज्या हिमालयाच्या परिसरात रहात होत्या आणि वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत होत्या. ही नावे होती: अत्रेय, हरित, पराशर, भेल, गार्ग, संभव्य, वसिष्ठ, कारल, काप्य आणि - आणि - सुश्रुत! ह्यापुढे जाऊन हे जे ३ पुरातन वैद्यकीय खंड बॉवर मॅन्युस्क्रीप्टसमध्ये होते त्याचे लेखक होते: चरक, भेल, आणि - होय - सुश्रुत!
सोबतचे पहिले चित्र पहा. दिसतात की नाही दोघे दाढीवाले सख्खे भाऊ? अगदी सख्खे नसले तरी सख्खे मावसभाऊ होते हे दोघे. पण त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे एकोणीसाव्या शतकातल्या जगातल्या दोन सर्वशक्तिमान साम्राज्यांचे सम्राट होते. डावीकडचा आहे रशियाचा झार दुसरा निकोलस आणि उजवीकडचा आहे इंग्लंडचा पाचवा जॉर्ज (आपल्यासाठी त्या काळचा 'भो पंचम भूप जॉर्ज' वगैरे वगैरे). ह्या दोन भावांमध्ये एकोणीसाव्या शतकाच्या शेवटी एक भयानक चढाओढ सुरु झाली - मध्य आशियात साम्राज्य विस्ताराची. रशियाला मध्य आशियात वर्चस्व हवे होते आणि ब्रिटीशांची भारतीय उपखंडातली सत्ता त्यांना सलत होती. आणि ब्रिटीशांना मध्य आशियामधले रशियाचे अस्तित्व नकोच होते. त्यादृष्टीने ते प्रयत्नशील होते. ह्या चढाओढीचे नावपण इतिहासात समर्पकपणे ठेवलेले आहे - 'द ग्रेट गेम'. ह्या काळात झालेल्या राजकीय चाली आणि हालचालींवर अनेक वाचनीय पुस्तके उपलब्ध आहेत. ह्याच चढाओढीत काही वर्षांनी ह्या दोघांचा तिसरा मावस भाऊ उतरला - तो म्हणजे जर्मनीचा सम्राट दुसरा कैझर विल्हेम आणि ह्या ग्रेट गेमचे रुपांतर पहिल्या जागतिक महायुद्धात झाले. तीन मावस भावांनी आपापसात खेळलेले हे युद्ध - पण संपूर्ण जगाला त्याची झळ बसली!
आता आपण सुश्रुत संहितेबद्दलच्या समस्या पाहूया. आज आपल्याला उपलब्ध असणारी सुश्रुत संहिता ही कमीत कमी एक वेळा आधीच्या एका सुश्रुत संहितेवर बेतलेली आहे. बौद्ध तत्त्वज्ञ नागार्जुन ह्याने ही आज आपल्याला माहित असलेली संहिता बनवलेली आहे. त्यामुळे हे सांगणे अशक्य आहे की त्यातले किती मूळचे आणि किती नागार्जुनाने वाढवलेले अथवा वगळलेले आहे. दुसरी समस्या म्हणजे कविराजांनी बघितलेल्या हस्तलिखितांमध्ये एकापेक्षा जास्त सुश्रुतांचा उल्लेख येतो. (सुश्रुताचा उल्लेख महाभारतातपण आहे!) त्यामुळे हे ठरवणे कठीण आहे की नेमका 'आपला' सुश्रुत कोणता! कविराजांच्या मते हा सुश्रुत गौतम बुद्धाच्या आधी २०० वर्षे होऊन गेला असावा - म्हणजे त्याचा काल ईसवी सन पूर्व ८०० येतो - पण ह्याबद्दल कोणतेच पुरावे नाहीत. काही इतिहास संशोधकांचे मत आहे की सुश्रुत बुद्धानंतर झाला. नक्की काहीच माहित नाही.
आता पुन्हा सुश्रुताकडे वळूया. त्याआधी एक गोष्ट करून पहा. गुगल ईमेज सर्च मध्ये 'Sushrut Surgeon India' हे सर्च करून पहा. पहिला जो फोटो येतो तो आपण सगळीकडे पाहिलेला असतो. एक दाढीवाला तेजस्वी माणूस एका रुग्णाच्या चेहेऱ्यावर काहीतरी शस्त्रक्रिया करत आहे. साधी पांढरी धोतरे घातलेले त्यांचे दोन सहाय्यक आहेत ज्यांनी रुग्णाला धरून ठेवले आहे - एक साडी नेसलेल्या बाई हातात काहीतरी घेऊन त्यांना मदत करत आहेत. एक सहाय्यक फक्त मागे उभा राहून हे सर्व पहात आहे. राजा रवि वर्म्याने काढल्यासारखे वाटते हे चित्र. बरेचदा त्याखाली लिहिलेले असते "सुश्रुत - ईसवी सन ६०० मध्ये प्लास्टिक सर्जरी करताना" किंवा "सुश्रुत - ईसवी सन ६०० मध्ये डोळ्याचे ऑपरेशन करताना". चित्र तेच असते फक्त कॅप्शन्स वेगवेगळ्या असतात. ह्या असल्या चित्रांखाली मी 'सुश्रुत' हे नाव पहिल्यांदा वाचले.
तर पुन्हा वळूया जानेवारी १७३१. पुण्यात शनिवारवाड्याचे बांधकाम संपले नव्हते. अमेरिकेला स्वातंत्र्य मिळायला ४५ वर्षे शिल्लक होती. त्यावेळेला इंग्लंडमध्ये एडवर्ड केव्ह नावाच्या माणसाने जगातले पहिलेवहिले मासिक छापले. 'द जन्टलमन्स मॅग्झिन' हे त्याचे नाव. एडवर्ड हा एका चांभाराचा मुलगा. अत्यंत धडपड्या. त्याने ही मासिकाची कल्पना लंडनमध्ये बऱ्याच लोकांकडे मांडली पण कुणाला पसंत पडली नाही. शेवटी त्याने स्वतःच कागद आणि मशीन विकत घेऊन अंक छापले. हे ते आद्य मासिक आणि त्यानंतर आलेली जगातली सर्व मासिके ह्याच 'द जन्टलमन्स मॅग्झिन' वर बेतलेली आहेत. त्या काळचे अनेक लोकप्रिय लेखक ह्या मासिकासाठी लिहीत असत. युरोपात ह्या मासिकाला प्रचंड मागणी होती. ईस्ट इंडिया कंपनी त्या वेळी भारतात आपले हातपाय पसरत होती. त्यामुळे पूर्वेकडील देशांमधील विविध गोष्टी - चालीरीती ह्या मासिकामूळेच युरोपात कळाल्या. तब्बल २०० वर्षे हे मासिक चालले आणि १९२२ मध्ये बंद झाले. ह्या लेखाचा विषय हे मासिक नाहीये. मी ह्या मासिकाचे जुने अंक चाळत असताना ऑक्टोबर १७९४ मध्ये ह्या मासिकात आलेला एक लेख माझ्या पहाण्यात आला. तो लेख हा कुतूहलाचा मुद्दा आहे. तो काय ते आपण पाहूया.