Saturday, March 13, 2021

असङ्गो अहम् | भाग १ : वेदान्ताचे चार आधारस्तंभ

 आज अनेक महिन्यांनी परत अद्वैत वेदांत या विषयाकडे वळत आहे. नुकताच  स्वामी सर्वप्रियानंद यांचा अत्यंत सुंदर व्हिडीओ https://www.youtube.com/watch?v=jID0akelFB0  पाहण्यात आला. 

वेदान्ताचे चार आधारस्तंभ विवेकानंदांनी सांगितले आहेत. अभय, अहिंसा, असंग आणि आनंद. यातील तिसरा आधारस्तंभ 'असंग' हा आहे. किंबहुना आपला अध्यात्मिक प्रवास आपण केवळ 'असंगाच्या' साहाय्याने करू शकतो.  असंग म्हणजे केवळ धन-संपत्ती यांचा निर्मोह नव्हे, समाजापासून दूर राहणे नव्हे. असंग या शब्दाचा अर्थ वेदान्ताच्या परिभाषेत खूप गहन आहे. असंग ही केवळ संन्यासींसाठीची आवश्यक गोष्ट नव्हे, संसारी माणसालाही आनंदी आयुष्य जगण्यासाठी आवश्यक गोष्ट आहे. 

संसारी माणूस संपत्ती, नोकरी-व्यवसाय, नातेसंबंध अशा अनेक गोष्टीत ताण-तणाव सहन करीत असतो. या ताण-तणावाचे चांगले नियोजन करण्यासाठी 'असंगभाव' मनात रुजणे आवश्यक आहे. 

विवेचनाला सुरुवात करण्यापूर्वी उपनिषदातील एका ऋचेचा परामर्श घेऊ 

त्वमेव भान्तं अनुभाति सर्वं |
तस्य भासा सर्वमिदं विभाति |

'जेव्हा ते प्रकाशाते  तेव्हाच बाकी सर्व प्रकाशते - त्याच्याच प्रकाशात सर्व काही प्रकाशते ' असे आपले हे वर्णन आहे. 'मी आहे म्हणूनच हे विश्व आहे' असे म्हणता येईल. हा 'मी' कोण आहे याचाच वेध घेण्याचा उपनिषदांचा आणि पर्यायाने अद्वैत वेदांताचा प्रयत्न आहे. 

हा 'मी' कोण आहे आणि तो 'असंग' आहे असे का म्हटले आहे ते पुढील भागात पाहू या. 

No comments:

Post a Comment