Friday, December 3, 2021

अद्वैत वेदांत : माया

परवाच्या माझ्या अद्वैत वेदान्ताच्या पोस्टवर काही मित्रानी प्रतिक्रिया व्यक्त केली की 'हे सर्व सैद्धांतिक दृष्ट्र्या पटते, पण अनुभवाला येत नाही. याला कारण काय असावे? यावर उपाय काय?' हे विश्व म्हणजे ब्रह्म आहे हे आपण मागील लेखात पहिलेच. आसपासचे विश्व सत्-चित्-आनंद रुपी ब्रह्म आहे. पण ते सहज लक्षात येत नाही. कारण त्यावर मायेने 'पांघरूण' टाकलेले असते. याच 'माया' संकल्पनेचा आपण आज विचार करणार आहोत. माया ही संकल्पना समजण्यास थोडी कठीण आहे. पण आपल्या वाचकांना ती समजेल असा विश्वास आहे. मायेचे पांघरूण म्हणजे काय आणि त्या आडून डोकावणारे ब्रह्म कसे ओळखायचे हे या लेखात पाहू.

आसपास आपल्याला अनेक वस्तू दिसतात, अनेक जीव दिसतात, आपले शरीर दिसते, आपल्या मनाची जाणीव होते, आपल्या चैतन्याची जाणीव होते. त्यामुळे हे सर्व खोटे आहे असे म्हणायला आपण धजावत नाही. आसपास जे विश्व दिसते ते खोटे आहे असे अद्वैत वेदांतही म्हणत नाही. आपल्या जाणिवेच्या विविध पातळ्या आहेत. त्यातील व्यावहारिक पातळीवर आसपास दिसणाऱ्या वस्तू, माणसे ही खरीच आहेत. परंतु वेगळ्या पातळीवरून पाहिल्यास हे विश्व आभासी आहे असे हे तत्वज्ञान सांगते. जाणिवेच्या या विविध पातळ्यांचे विवेचन मांडुक्य उपनिषदांत आले आहे. तो मोठा विषय आहे. त्यासंबंधी आपण एका स्वतंत्र लेखात विचार करू.  या लेखात केवळ माया, मायेचे पांघरुण आणि त्या पांघरुणाआडून डोकावणारे ब्रह्म याचाच विचार करू. 

एक सोन्याचा नेकलेस आहे. त्यातून सोने काढले तर त्या नेकलेसला अस्तित्व नसेल. तो वितळविला तर सोने उरेल, नेकलेस राहाणार नाही. त्या सोन्यापासून आपण पाटल्या बनवू शकू. याचाच अर्थ तो नेकलेस अथवा पाटल्या हे वस्तूत:  केवळ सोने आहे. नेकलेस अथवा पाटल्या हे त्या सोन्याला दिलेले रूप आहे. त्या रुपामुळे आपल्याला ते व्यवहारात वापरता येते. त्या सोन्याला आपण 'नेकलेस' अथवा 'पाटल्या' हे नाव दिलेले आहे. या नाम-रुपामुळे आपल्याला मूळचे सोने असलेले 'नेकलेस' आणि 'पाटल्या' वेगळे भासतात. त्यांचा व्यवहारात वेगळा 'उपयोगही' करून घेता येतो. परंतु खोलवर पाहता ती एकच वस्तू आहे - ते केवळ सोने आहे. तसेच हे विश्व म्हणजे सत्-चित्-आनंद रुपी ब्रह्म आहे. त्यावर मायेने नाम-रूपाचे पांघरूण टाकले आहे. 

मायेच्या या पांघरूण टाकण्याच्या शक्तीला 'आवरण शक्ती' असे नाव आहे. मायेची ही आवरण शक्ती ब्रह्मरूपी विश्वावर नाम-रूपाचे पांघरूण टाकत असली तरी ब्रह्माला पूर्णपणे झाकू शकत नाही. यातून ब्रह्म डोकावत असतेच. अंधारात दोर (रज्जू) पडलेला असताना तो साप समजून आपण घाबरतो. पण या काल्पनिक सापाचा आकार, लांबी त्या दोराकडून आलेली असते. ती झाकली जात नाही. तो दोर आहे ही वस्तुस्थिती झाकली जाणे ही झाली 'आवरण शक्ती'. परंतु तेथे साप नसताना तो आहे असा भास होणे हे झाले 'विक्षेप शक्ती'चे उदाहरण. माया ही ब्रह्माची एक शक्ती आहे. तिच्यात 'आवरण शक्ती' आणि 'विक्षेप शक्ती' या दोन शक्ती अंतर्भूत आहेत. 

या विश्वातील प्रत्येक गोष्टीत 'सत्' म्हणजेच अस्तित्वरुपी ब्रह्म आहेच. जसे नेकलेसमधून सोने काढून घेतले तर तो नेकलेस राहणार नाही तद्वतच एखाद्या गोष्टीतून अस्तित्व काढले तर ती वस्तू राहणार नाही. जसा नेकलेस हा नाम-रूपाचे आवरण घातलेले सोने आहे तसेच हे विश्व हे नाम-रूपाचे आवरण घातलेले ब्रह्मच आहे.

विश्वाचे हे ब्रह्मरूपी स्वरूप आपल्या लक्षात येण्यासाठी अत्यंत स्थिर चित्ताची आवश्यकता आहे. चित्त स्थिर करण्यासाठी ध्यानमार्ग आणि भक्तिमार्ग हे दोन मार्ग सांगितलेले आहेत. यापैकी कोणत्याही मार्गाने चित्ताची स्थिरता प्राप्त करता येते. जसजसे चित्त स्थिर होत जाईल तसे काही क्षण या विश्वरूपी ब्रह्माची जाणीव होऊ लागते. हळूहळू हा कालावधी वाढत जातो.

पण काही जणांचे चित्त भक्तिमार्गाने अथवा ध्यानमार्गाने प्रवास करूनही स्थिर होऊ शकत नाही. याचे कारण म्हणजे मनाची मलिनता. मलीन मन असताना चित्त कधीही स्थिर होऊ शकत नाही. ही मनाची मलिनता दूर करण्यासाठी अनेक पद्धती सांगितल्या गेल्या आहेत. राजयोगात यमनियम आहेत. गीतेत 'कर्मयोग' आहे. कोठलीही अपेक्षा न ठेवता समाजसेवा केली तरी मनाची मलिनता दूर होते.

आपल्या सर्वांना मायेचे आवरण बाजूस सारून या विश्वाचे ब्रह्मस्वरूप अनुभवास येवो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

ईशावास्योपनिषदातील शांतीमंत्राने या प्रदीर्घ लेखाची सांगता करूया. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते ।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते॥
ॐ शांतिः शांतिः शांतिः ॥

*************************************************


अद्वैत वेदांत

अद्वैत वेदांत हे दर्शन अन्य कोणत्याही दर्शनापेक्षा अथवा पाश्चात्य धर्मांपेक्षा क्रांतिकारी आहे. हे दर्शन आपल्याला देव कोठे अन्य ठिकाणी (स्वर्ग, देऊळ, चर्च, मशीद  इत्यादी) असल्याचे सांगत नाही, देव तुम्हाला भविष्यात भेटण्याची (मृत्यूनंतर, काही कर्मकांडे केल्यावर, प्रार्थना केल्यावर) हमी देत नाही. देव तुमच्यासाठी काही सुख भविष्यात देईल असे अमिष दाखवीत नाही, तुम्ही काही कर्मकांडे न केल्यास दु:खाचे डोंगर कोसळतील अशी भीती दाखवीत नाही.  हे दर्शन तुम्हाला काही अलौकिक अनुभव देण्याची हमी देत नाही. तुमच्या नेहमीच्या अनुभवाचे शास्त्रशुद्ध विश्लेषण करून प्रथम आपण ब्रह्म असल्याचे दाखवून देण्याचे काम हे दर्शन करते. नंतर केवळ आपणच नव्हे तर हे विश्व ब्रह्म  असल्याचे हे दर्शन दाखवून देते. आसपासचे विश्व ब्रह्म असून त्यावर मायेने नाम-रूपाचे पांघरूण घातलेले आहे. या नाम-रूपाआडून सत्-चित्-आनन्द रुपी ब्रह्म डोकावत असते. हे ब्रह्माचे स्वरूप ओळखायचे कसे हे ही हे दर्शन शिकविते. म्हणूनच मला हे दर्शन क्रांतिकारी वाटते. 

आजवर मी अद्वैत वेदांतासंबंधी बरेच लिहिले आहे. परंतु ते प्रामुख्याने या दर्शनाच्या विविध प्रकरण ग्रंथांच्या ((Introductory Text) टिपणी (नोट्स) या स्वरूपात होते. प्रथमच मी या विषयावर स्वतंत्रपणे लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे. विषयाचा आवाका प्रचंड आहे. हा विषय संक्षिप्तपणे आणि तरीही सामान्यांना समजेल अशा भाषेत मांडणे ही तारेवरची कसरत आहे. पण सध्याचे युग हे अति जलद युग आहे. कोणालाही मोठे ग्रंथ वाचण्यास अथवा विस्तृत विवेचन वाचण्यास वेळ नाही. म्हणून हा प्रयत्न करून बघणार आहे. 

अद्वैत वेदांत दर्शन हे सहा प्रमुख हिंदू दर्शनांपैकी सर्वात अर्वाचीन दर्शन आहे. भारत बौद्ध दर्शनाच्या प्रभावाखाली जात असतानाच आद्य शंकराचार्यांनी अद्वैत हिंदुत्वाचा प्रसार करून भारतीय जनतेला उपनिषदांची नव्याने ओळख करून दिली. जरी आद्य शंकराचार्यांनी अद्वैत वेदांताची शास्त्रशुद्ध मांडणी प्रथमच केली असली तरी त्यापूर्वी त्यांचे आजेगुरु (गुरूंचे गुरु) गौडपादाचार्य यांनी त्यांच्या मांडुक्यकारिका (मांडुक्य उपनिषदावरील टीका) या ग्रंथातून या दर्शनाची बीजे रोवली होती. 

सहा प्रमुख दर्शनांत पूर्वमीमांसा (अथवा मीमांसा) आणि उत्तरमीमांसा (अथवा वेदांत ) ही दोन दर्शने आस्तिक दर्शने मानली जातात. आस्तिक याचा अर्थ वेदप्रामाण्य मानणारी दर्शने. ही दोन दर्शने वेदप्रामाण्य मानणारी असली तरी त्यांच्यात खूप फरक आहे. यज्ञयाग आणि अन्य पूजाविधींच्या साहाय्याने देवतांना प्रसन्न करून घेणे आणि त्याद्वारे भौतिक आणि पारलौकिक सुखे मिळविणे हा पूर्वमीमांसकांचा (मीमांसकांचा) उद्देश आहे. म्हणूनच वेदातील तत्वज्ञानाचा भाग -अर्थात उपनिषदे- मीमांसक दुय्यम समजतात. या उलट वेदान्तिक आणि त्यातही अद्वैत वेदान्तिक उपनिषदांना महत्व देतात, तर वेदातील कर्मकांडाला दुय्यम महत्व देतात. 

अद्वैत वेदांत उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि भगवतगीतेवर आधारलेले आहे. त्यांना अद्वैत वेदांतात 'प्रस्थानत्रयी' म्हणतात. १०८ प्रमुख उपनिषदांपैकी दहा (अथवा अकरा .. याबद्दल मतभेद आहेत) उपनिषदांवर आद्यशंकराचार्यांनी टीका लिहिली आहे. म्हणून ही दहा उपनिषदे प्रमुख मानली जातात. या दहा उपनिषदातही 'मांडुक्य उपनिषद' हे महत्वाचे आहे. हे सर्वात लहान उपनिषद असून अर्थवाही आहे. त्यावर अद्वैत वेदान्ताच्या अनेक भाष्यकारांनी टीका लिहिली आहे. 


Wednesday, November 24, 2021

अद्वैत वेदांत : आत्मा, पुनर्जन्म

 भारतीय अध्यात्मात आत्मा, पुनर्जन्म यांना एक विशिष्ट स्थान आहे. त्यामुळे अद्वैत वेदांताचा अभ्यास करताना या दर्शनात आत्मा, पुनर्जन्म या संकल्पनांना काही स्थान आहे काय याचा विचार ओघानेच येतो. 

अद्वैत वेदांतात ब्रह्म हेच एकमेव आहे असे मानले जाते. त्यामुळे जन्म कोणाचा हा प्रश्न आहे. आपण जर सर्वांभूती असलेले ब्रह्म असू तर हे ब्रह्म जन्म कसे घेणार आणि मृत्यू तरी कसे पावणार? जन्मच नसेल तर पुनर्जन्माचा प्रश्नच येत नाही. तसेच आत्मा कोणाचा हाही प्रश्न येतो. म्हणजेच आत्मा, पुनर्जन्म या संकल्पनांना प्रथमदर्शनी तरी या दर्शनात स्थान नाही. 

जरी आत्मा, पुनर्जन्म या संकल्पनांना स्थान नसले तरी खोलात गेल्यावर भारतीय अध्यात्मात असलेल्या या संकल्पनांचा सांधा कोठेतरी जोडता येतो. प्रथम हे स्पष्ट व्हायला हवे की जन्म, आत्मा हे या दर्शनानुसार 'माये'च्या क्षेत्रात येते. विश्वाच्या  आकाशात सत्-चित्-आनंद रुपी सर्वसाक्षी ब्रह्म तळपत आहे. या ब्रह्माचे प्रतिबिंब आपल्या मनात उमटते. आपले मन ब्रह्माचे हे सत्-चित्-आनंद गुण सर्वसाक्षी ब्रह्माकडून उधार घेते (Acquired qualities).  मनाचा 'अहंकार' हा भाग या प्रतिबिंबाशी एकरूप होतो.  आपल्या चेतासंस्थेच्या साहाय्याने तो संपूर्ण शरीरात पसरतो. मग आपल्याला आपले शरीर चैतन्यमय भासते. हे ब्रह्माचे प्रतिबिंब आपल्या अहंकाराशी (मी-पणाच्या भावनेशी) एकरूप झालेले असल्याने आपल्याला हा चैतन्यमय अहंकार म्हणजे आपला 'आत्मा' आहे असे वाटते. अहंकाराची जोड मिळाल्याने तो 'माझा' आत्मा आहे असे आपण विधान करतो. चेतासंस्थेचे केंद्र मेंदू असल्याने आपल्याला आपला आत्मा आपल्या मेंदूत आहे असेही अनेक वेळा वाटते. अद्वैत वेदान्ताच्या मते 'आत्मा' म्हणजे केवळ सर्वसाक्षी ब्रह्माकडून  सत्-चित्-आनंद उधार घेतलेला आपला अहंकार असतो. 

एका माळ्याने काही बालाद्यांत पाणी भरून ते उघड्यावर उन्हात ठेवले आहे. प्रत्येक बालदीमध्ये सूर्याचे प्रतिबिंब पडले आहे. प्रत्येक बालदीला तो आपला स्वतंत्र आत्मा वाटतो. खरे तर ते एकाच सूर्याचे प्रतिबिंब आहे. कधीकधी या बालदीतील पाणी गढूळ होते. मग बालदीतील सूर्याचे प्रतिबिंबही झाकोळते. बालदीला वाटते की आपल्या आत्म्यावर-चैतन्यावर मळभ आले आहे. खरे तर साक्षी-चैतन्याचा सूर्य त्याच तेजाने तळपत असतो. बालदी उगचगच खंतावते. कधीकधी बालदीतील पाणी डुचमळते. सूर्याच्या प्रतिबिंबाचे तुकडे-तुकडे होतात. बालदी खोल निराशेत -डिप्रेशनमध्ये- फेकली जाते. पण खरेतर साक्षीचैतन्याच्या सूर्याला काहीही झालेले नसते. थोड्याच वेळात पाणी शांत होऊन प्रतिबिंब तेजाने झळकू लागते. कधीकधी बालदी जुनी होते. गळू लागते. मग माळी त्यातील पाणी दुसऱ्या बालदीत ओततो. नव्या बालदीत परत सूर्याचे प्रतिबिंब उमटते. हाच तो पुनर्जन्म. या नव्या बालदीत जुन्या बालदीतील प्रतिबिंब गेले आहे काय? मग नव्या जन्मात मागील जन्मातील आत्मा जातो का?

वरील उदाहरणात माळ्याने एका बालदीतील पाणी दुसऱ्या बालवाडीत ओतले. तद्वतच आपला मनोमय कोष दुसऱ्या शरीराला जाऊन चिकटतो आणि त्याच्यात परत साक्षीचैतन्याचे प्रतिबिंब पडते. यालाच कदाचित आपण आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो असे म्हणू शकू. पण हा सर्व खेळ मायेच्या परिक्षेत्रात चालला आहे हे ध्यानात ठेवायला हवे. 

आत्मा आणि पुनर्जन्म या संकल्पनांचा मी माझ्या समजुतीनुसार लावलेला हा अर्थ आहे. 

२६/११ नाही २४/११ म्हणा..

 २६/११ नाही २४/११ म्हणा..

26/11 कारस्थनाचे प्रत्यक्ष execution पाकिस्तानच्या आधी 24/11 रोजी भारतात सुरू झालं होतं! 24/11 ते 26/11 मध्ये काय घडलं होतं याचं गुपित या 6 महत्वाच्या प्रश्नांच्या उत्तरात आहे..
प्रश्न १ : २६/११ हल्ल्यादरम्यान महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आवश्यक असलेल्या भारताच्या सुरक्षा यंत्रणेतील (SECURITY APPARATUS) काही महत्त्वाचे सदस्य- यामध्ये केंद्रीय गृह सचिव, जॉइंट सेक्रेटरी अंतर्गत सुरक्षा, डायरेक्टर अंतर्गत सुरक्षा असे महत्वाच्या जबाबदारी असलेले अधिकारी कुठे होते?
उत्तर : तत्कालीन केंद्रीय गृहसचिव मधुकर गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील गृहमंत्रालयातील ९ सदस्यीय उच्चस्तरीय दल २४ नोव्हेंबर २००८ रोजी इस्लामाबाद येथेे गेले होते आणि २ दिवसांनी परत येणार होते, म्हणजे २६ नोव्हेंबरला दुपारी. पण, त्यांनी इस्लामाबादच्या ६० किमी उत्तरपूर्वकडे असलेल्या मुरी या थंड हवेच्या ठिकाणी अजुन एक रात्र रहायचे पाकिस्तानचे निमंत्रण स्वीकारले आणि तिकडे गेले. म्हणजे २६/११ च्या रात्री जेंव्हा मुंबईत कत्तल सुरू होती, हे सगळे तिकडे शराब आणि शबाब मध्ये रमले होते..
प्रश्न २ : पण, ते स्वतःच्या मनाप्रमाणे असा पूर्वनियोजित कार्यक्रम कसे बदलू शकतात?
उत्तर : ह्या टीम मध्ये शेवटच्या क्षणी, केंद्रीय गृह मंत्री यांच्या आदेशानुसार एक अधिकारी (मंत्रीजींचा खास) शामिल केला गेला होता. त्यांनी पाकिस्तानी निमंत्रण स्वीकारलं आणि इतर अधिकाऱ्यांनीही त्याची 'वट' लक्षात घेता मान्य केलं. फक्त एक अधिकारी - राजेन्द्र सिंग, यांना या सगळ्या प्रकारात काही तरी गडबड वाटली आणि ते पर्सनल कारण सांगून ठरलेल्या कार्यक्रमानुसार परत आले!(बाकी, यांना नंतर इशरत जहाँ केसमध्ये गुंतवून खुप त्रास दिला गेला..)
प्रश्न ३ : मग, रात्री हा हल्ला झाल्यानंतर या अधिकाऱ्यांना कोणी संपर्क करुन सांगितले का नाही?
उत्तर : मूरी त्यावेळी एक 'नो नेटवर्क झोन' होता. तिकडे मोबाइल नेटवर्क तर नव्हताच, लॅंडलाइन कनेक्टिविटी पण ९९% वेळा अल्लाहच्या आणि १% पाकिस्तान सरकार भरोसे होती. टेली-कम्युनिकेशन, केबल-टीवी नेटवर्क बंद करुन यांना बाई-बाटली मध्ये पाकिस्तानने नीट रमवून ठेवलं होतं.
प्रश्न ४ : मग, इकडे होते ते अधिकारी काय करत होते?
उत्तर : अशा इमरजन्सीमध्ये एस.ओ.पी प्रमाणे कामं केली जातात. जर, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वॉर-रुम मध्ये बसायला, नेतृत्व करायला आणि आदेश द्यायलाच कोणी नव्हतंच, तर काय करायचं हे नेमकं सांगणार आणि ठरवणार तरी कोण? नुसता गोंधळ चालू होता तिकडे दिल्लीत त्यावेळी.. एनएसजी कमांडो उशिरा पोचले, त्यांना दिल्ली ते मुंबई वेळेत विमान उपलब्ध नव्हते, मुंबईत उतरल्यावर त्यांना घेऊन जाण्यासाठी BEST च्या विशेष बस साठी तब्बल ९० मिनिट वाट पहावी लागली आणि तो पर्यंत एकही (ताज हॉटेल चे फ्लोर प्लान सकट) लोकेशनचे मॅप त्या NSG कमांडोजसाठी तयार ठेवण्यात आले नव्हते. मीडिया ला कोणी Do's & Dont's सांगायला नव्हतं ज्यामुळे रावळपिंडीत ISI वाले एनएसजीच्या हालचाली लाईव्ह बघत होते! ब्यूरोक्रेटिक लिडरशीप तिकडे बाई-बाटली च्या नशेत तरर्र होती..
प्रश्न ५ : पाकिस्तानने असं का केलं?
उत्तर : युद्धात 'स्ट्रेटेजिक डिसेप्शन' हे एक मोठे हत्यार असते. पाकिस्तान ला याबद्दल तिळमात्र शंका नव्हती की ते भारताविरुद्ध युद्ध करत आहेत. भारतात मात्र अगदी आज पण २६/११ ला 'आतंकवादी हमला' म्हणत आहेत आपली लोकं, युद्ध नाही. भारतात नेमकं हेच होणार याची पाकिस्तानला खत्री होती. २६/११ सारखे कांड करायचे धाडस पाकिस्तान ला भारतात नसलेल्या Clarity of thoughts मुळे सहज-शक्य झालं.
प्रश्न ६: मग, हे सगळे २६/११ नंतर लोकांना का सांगितलं नाही?
उत्तर : "बडे-बडे शहरों में छोटी-छोटी बातें होती रहती है!"- आर आर पाटील उर्फ आबा, गृह मंत्री, महाराष्ट्र शाशन बोलले. मुख्यमंत्री विलासराव देशमुख रितेश आणि रामगोपाल वर्माला घेऊन ताज हॉटेलला गेले. केरळ चा मुख्यमंत्री (अ)चुतियानंदन बोलला की संदीप उन्नीकृष्णन च्या घरी कुत्रा पण जाणार नाही. शिवराज पाटील चाकुरकर ७२ तासात ८ वेळा कपडे/कोट बदलत राहिले.. कसाब ला पकडणाऱ्या ओंबाळे यांच्या शौर्याची थट्टा करत ही लोकं 'भगवा आतंकवाद' बोंबलत राहिले, आणि राज्यात आणि केंद्रात दोन्हीकडे सत्ताधारी असलेल्या काँग्रेसने पाकिस्तानला एक प्रकारे क्लीन-चिटच दिली होती! करकरे कामठे साळसकर यांच्या या हल्ल्यात झालेल्या मृत्यूवरून जाणूनबुजून निर्माण केलेला वाद आणि ज्यांनी बोलायला हवं होतं त्या मनमोहन सिंग यांचे लज्जास्पद मौन.. असे अनेक फॅक्टर्स होते. पब्लिकला नको त्या विषयांत व चर्चांत बिजी ठेवण्यात राजकारणी आणि मीडिया ला यश मिळालं! मग, 24/11 ते 26/11 मधील या कारस्थानावर कोण बोलणार?
मग आता?
४ दिवस देशाच्या इज्जतीची लखतरं गेटवे ऑफ इंडिया वर टांगणाऱ्या २६/११ च्या 'युद्धात', हलकट सरकार व गद्दार अधिकाऱ्यांमुळे जीव गमावलेल्या भारतसहित १७ देशांच्या १८४ निष्पाप लोकांना, महाराष्ट्र पोलिसांच्या १४ जवान/अधिकाऱ्यांना आणि २ एनएसजी कमांडोंना भावपूर्ण श्रद्धांजली वाहायची आणि गप्प बसायचं!
- वेद कुमार

Sunday, November 21, 2021

चितोड

 खरे तर हे पवित्र ठिकाण राष्ट्रीय स्मारक व्हावे.
-------------------------------------------------------------------




#जोहर
, हा शब्द ऐकला, वाचला की आपल्याला आठवतात त्या महाराणी पद्मावती.! ज्यांनी धगधगत्या अग्निकुंडात उडी घेऊन स्वतःची आहुती देणं स्वीकारलं, त्या खिलजी नामक सैतानाच्या हातात जाण्यापेक्षा.!
खाली जो फोटो आहे, ती हीच जागा आहे, हेच ते कुंड आहे ज्यात महाराणी पद्मावती ह्यांनी त्या अग्निकुंडात उडी घेतली होती.!
चितोडच्या किल्ल्यात असलेल्या ह्या जागेपर्यंत जायचा रस्ता आजपण इतका अंधारलेला आहे, की आजपण कोणी त्या रस्त्यावर जायची हिंमत करत नाही.!
त्या रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या भिंती आणि तिथून बऱ्यापैकी दूर असलेल्या दालनांच्या भिंती आजपण त्या धगधगत्या अग्नीचा अनुभव आपल्याला करून देतात.! त्या विशाल अग्निकुंडाच्या भिंतींना लावलेला चुना आजपण त्या विक्राळ अग्नीच्या उष्णतेची साक्ष देतोय.!
फोटोमध्ये त्या कुंडातला एक दरवाजा दिसतोय.!.तेथील स्थानिक लोक विश्वासाने सांगतात, की महाराणी पद्मावती ह्यांनी तिथूनच आपल्या सगळ्या सख्या आणि किल्ल्यावरच्या जवळपास सगळ्या महिलांसोबत त्या विशाल अग्निकुंडात उडी घेतली होती.!
स्थानिक लोक विश्वासाने असही सांगतात, की आजही तिथे कधी कधी किंकाळ्या ऐकायला येतात.!
पण ह्या किंकाळ्या नाहीयेत, तर त्या सगळ्या वीरांगनांनी त्यांच्या हिंदू भावा बहिणींना मारलेल्या हाका आहेत.! त्या सांगतायत की एका सैतानाच्या तावडीत जाऊन आपला धर्म लांछित करण्यापेक्षा आम्ही मरण पत्करल.!
आम्हाला कधीच विसरू नका.!
महाराणी पद्मावती आणि त्यांच्यासोबतच्या सगळ्या वीरांगना ह्यांचे नाव आम्ही हिंदू हजार जन्म घेतले तरी विसरु शकतच नाही.!
महाराणी पद्मावती आणि त्यांच्यासोबत आहुती दिलेल्या सर्व वीरांगनांना कोटी कोटी प्रणाम.!
🙏🙏🙏🙏🙏🌷🚩

Edit
Bhushan Kanade, Swati Kulkarni Bapat and 12 others
4 Shares
Like
Comment
Share

Comments